शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मायबाप सरकार....राजमा पिकवायचा का नाय? कोरेगावातील शेतकºयांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:24 IST

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे.

ठळक मुद्देदर घसरले :कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव, खटाव तालुक्यातील शेतकºयांना सोन्याचा दर देणारा राजमा केवळ दीड ते अडीच हजार रुपये क्विंटल दराने विकावा लागत आहे. ‘मायबाप सरकार तुम्हीच सांगा, आम्ही राजमा पिकवायचा का नाय?’ असा सवाल शेतकरी विचारू लागले आहेत.कमी वेळेत कमी पाण्यावर चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून राजमा ओळखला जातो. कोरेगाव तालुक्यात राजम्याचे भरघोस उत्पादन घेतले जाते. येथील चवदार राजम्याला देशभरातील बाजारपेठांमधून मागणी आहे. अलिकडच्या काळात कोरेगाव बरोबरच खटाव आणि माण तालुक्यांच्या काही भागातही राजम्याचे पीक घेतले जाते.

यावर्षी मान्सून थोडाफार झाल्यावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यानंतर दडी मारलेल्या मान्सूनने अधूनमधून थोडी फार हजेरी लावली. त्यावर आलेले पीक हातात पडण्याची वेळ आल्यावर परतीच्या पावसाने त्यावर पाणी फिरविले. त्यातूनही वाचलेले पीक बाजारात घेऊन गेल्यावर मिळत असलेल्या दराने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भिजलेला घेवडा सुकवता-सुकवता नाकीनऊ आले होते. त्यात उत्पादन खर्च निघेल एवढाही दर पदरात पडत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.दिल्ली, पंजाब मुख्य बाजारपेठदिल्ली, पंजाब, जम्मू-काश्मीर ही या पिकांची मोठी आणि प्रमुख बाजारपेठ आहे. वाघा घेवडा ही राजम्याची खरी ओळख. गेल्या दहा वर्षांत यात बीज क्रांती होऊन ‘वरुण’ या नावाने अडीच महिन्यांत आणि अतिशय कमी पाण्यात दुप्पट उत्पन्न देणारा वाण विकसित करण्यात आला. त्यामुळे मूळचा वाघा घेवडा आता नामशेष झाल्यात जमा झाला आहे. तरीही त्याची बाजारपेठेतील मागणी कमी झालेली नाही. तिन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य शेतकºयांचे आर्थिक गणित याच घेवड्यावर अवलंबून आहे.