शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

माउलींची पालखी बरडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:51 IST

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या ...

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या मनीचि आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ याप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन बरडकडे मार्गस्थ झाला.वाटेत धुळदेव येथे परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे, सुभाष शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी, भाडळी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच प्रशांत जाधव, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे सदस्या सुशीला नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, सचिन भोसले, अशोकराव पवार, डॉ. उत्तमराव शेंडे यांनी स्वागत केले.वाजेगाव येथे दुपारचा विसावा घेतला. तेथे सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, सुजित रणवरे, अमोल निंबाळकर, मोहन नाईक-निंबाळकर, शंभूराज निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीकांत निंबाळकर, लालासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले. काही काळ विश्रांती घेऊन वारकरी मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी बरडला विसावले. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, जिल्हा परिषद सदस्य भावना सोनवलकर, नानासाहेब लंगुटे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्वागत केले.आज सोलापूर जिल्ह्यातश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेले चार दिवस सातारा जिल्ह्यात आहे. तो मंगळवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी येथे निरोप तर सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.