शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

माउलींची पालखी बरडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:51 IST

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या ...

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या मनीचि आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ याप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन बरडकडे मार्गस्थ झाला.वाटेत धुळदेव येथे परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे, सुभाष शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी, भाडळी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच प्रशांत जाधव, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे सदस्या सुशीला नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, सचिन भोसले, अशोकराव पवार, डॉ. उत्तमराव शेंडे यांनी स्वागत केले.वाजेगाव येथे दुपारचा विसावा घेतला. तेथे सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, सुजित रणवरे, अमोल निंबाळकर, मोहन नाईक-निंबाळकर, शंभूराज निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीकांत निंबाळकर, लालासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले. काही काळ विश्रांती घेऊन वारकरी मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी बरडला विसावले. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, जिल्हा परिषद सदस्य भावना सोनवलकर, नानासाहेब लंगुटे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्वागत केले.आज सोलापूर जिल्ह्यातश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेले चार दिवस सातारा जिल्ह्यात आहे. तो मंगळवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी येथे निरोप तर सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.