शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

माउलींची पालखी बरडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 22:51 IST

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या ...

वाठार निंबाळकर : विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीहून पंढरपूरला निघालेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी जिल्ह्यातील शेवटच्या मुक्कामासाठी बरड मुक्कामी विसावला. फलटण येथून सकाळी सहा वाजता दिंड्यांनी प्रस्थान केले. या दरम्यान गावोगावी स्वागत करण्यात आले.फलटण शहरातील मुक्काम आटपून पालखी सोहळा सोमवारी ‘जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन तया पांडुरंगा, माझ्या मनीचि आवडी, पंढरपुरा नेईन गुडी’ याप्रमाणे पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन बरडकडे मार्गस्थ झाला.वाटेत धुळदेव येथे परशुराम फरांदे, व्यंकटराव दडस, माणिकराव कर्णे, सुभाष शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले. कोळकी, सोमंथळी, झिरपवाडी, सांगवी, अलगुडेवाडी, भाडळी ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले.हरिनामाचा गजर व टाळ मृदंगाच्या निनादात पालखी सोहळा न्याहरीसाठी विडणी येथे विसावला. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रुपाली अभंग, उपसरपंच प्रशांत जाधव, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, पंचायत समितीचे सदस्या सुशीला नाळे, ग्रामविकास अधिकारी डी. बी. चव्हाण, सचिन भोसले, अशोकराव पवार, डॉ. उत्तमराव शेंडे यांनी स्वागत केले.वाजेगाव येथे दुपारचा विसावा घेतला. तेथे सरपंच संगीता निंबाळकर, उपसरपंच रवींद्र भोसले, सुजित रणवरे, अमोल निंबाळकर, मोहन नाईक-निंबाळकर, शंभूराज निंबाळकर, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीकांत निंबाळकर, लालासाहेब निंबाळकर यांनी स्वागत केले. काही काळ विश्रांती घेऊन वारकरी मुक्कामासाठी बरडकडे मार्गस्थ झाले. सायंकाळी बरडला विसावले. सरपंच तृप्ती गावडे, उपसरपंच गोरख टेंबरे, जिल्हा परिषद सदस्य भावना सोनवलकर, नानासाहेब लंगुटे, उपसभापती शिवरूपराजे खर्डेकर यांनी स्वागत केले.आज सोलापूर जिल्ह्यातश्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गेले चार दिवस सातारा जिल्ह्यात आहे. तो मंगळवारी सातारा जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. जिल्ह्याच्या सीमेवर राजुरी येथे निरोप तर सातारा जिल्ह्याच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.