शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

By admin | Updated: July 6, 2016 00:29 IST

उत्साहात स्वागत : पादुकांच्या नीरा स्नानानंतर वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात दाखल

लोणंद : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,आणिक दर्शन विठोबाचे,हेचि घडो मज जन्मजन्मांतरी,मागणे श्रीहरी नाही दुजे...ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरा तीरी मंगळवारी उत्साहात स्वागत झाले.माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी दोनला आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे पालखीचे सूत्र सुपूर्त केले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट, युवक काँग्रेसचे राहुल गाढगे, शामराव गाढवे आदींनी पालखीचे स्वागत केले. यावेळी समता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीमचे सादरीकरण करून स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. (प्रतिनिधी)नीरा तीर दुमदुमलामाउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्तघाटावर अभ्यंगस्नान घातले. त्यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माउलींचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी ‘माउली, माउली..’चा जयघोष केला. दुपारी दोन वाजता अभ्यंगस्नान झाल्यानंतर पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडी प्रमुखांच्या आदेशाने पालखी रथ जिल्ह्याच्या स्वागतकमानीजवळ आला. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.