शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

माउलींचे पाऊल साताऱ्याच्या अंगणात!

By admin | Updated: July 6, 2016 00:29 IST

उत्साहात स्वागत : पादुकांच्या नीरा स्नानानंतर वैष्णवांचा मेळा जिल्ह्यात दाखल

लोणंद : पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान,आणिक दर्शन विठोबाचे,हेचि घडो मज जन्मजन्मांतरी,मागणे श्रीहरी नाही दुजे...ही भावना उराशी बाळगून सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेले लाखो वारकरी, नभांगणी फडकणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गगनभेदी निनाद, ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि देहभान विसरून नाचणारा वैष्णवांचा मेळा अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नीरा तीरी मंगळवारी उत्साहात स्वागत झाले.माउलींच्या सहवासात पंढरीच्या विठुरायाची वारी पूर्ण करण्याची आस मनात बाळगून अवघ्या महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही लाखो वारकरी लोणंदनगरीत दाखल झाले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा नदीच्या तीरावर पुणे जिल्ह्यातून पालखीचे दुपारी दोनला आगमन झाले. यावेळी पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील मान्यवरांसह हजारो भाविक उपस्थित होते. नीरा नदीवरील पुलावर माउलींच्या पालखीचा रथ थांबल्यानंतर प्रथेप्रमाणे माउलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले.पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे पालखीचे सूत्र सुपूर्त केले. पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सभापती नितीन भरगुडे-पाटील, उपसभापती सारिका माने, पंचायत समिती सदस्य रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, तहसीलदार शिवाजीराव तळपे, गटविकास अधिकारी दीपा बापट, युवक काँग्रेसचे राहुल गाढगे, शामराव गाढवे आदींनी पालखीचे स्वागत केले. यावेळी समता आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ढोल, लेझीमचे सादरीकरण करून स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. (प्रतिनिधी)नीरा तीर दुमदुमलामाउलींच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्तघाटावर अभ्यंगस्नान घातले. त्यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. माउलींचा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी ‘माउली, माउली..’चा जयघोष केला. दुपारी दोन वाजता अभ्यंगस्नान झाल्यानंतर पादुका रथामध्ये ठेवण्यात आल्या. दिंडी प्रमुखांच्या आदेशाने पालखी रथ जिल्ह्याच्या स्वागतकमानीजवळ आला. त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.