शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

...तर कोरोनाग्रस्तांना घेऊन 'मातोश्री'त ठाण मांडणार; सदाभाऊंचा ठाकरे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 09:57 IST

अपुऱ्या रेमडेसिविरवरून सदाभाऊ खोत आक्रमक; सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

सातारा : ‘राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने मृत्युदर वाढला आहे. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. येत्या दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा न झाल्यास कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीत ठाण मांडणार आहे,’ असा खणखणीत इशारा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खोत बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, शंकर शिंदे, प्रकाश ऊर्फ सोनू साबळे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी विविध राज्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्र शासनाने दुसरी लाट येणार म्हणून डांगोरा पिटला, पण त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. ऑक्सिजन प्लँट, औषध खरेदी, आरोग्य विभागात भरती करायला हवी होती. रस्ते किंवा इतर कामे करण्यापेक्षा माणसं वाचवायला हवी होती.

रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काही कंपन्यांबरोबरच करार केला. मात्र, राज्य शासन ६५० रुपये किंमत म्हणत आहे, तर कंपन्या १२५० रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत, असे सांगून माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राज्याने इंजेक्शन खरेदी केले नाही आणि मेडिकलवाल्यांना घेऊही दिले नाही. याचे कारण स्पष्ट आहे की, औषधनिर्माण मंत्र्यांना यातून खंडणी गोळा करायची होती. तसेच राज्य सरकार कंपन्यांवर दबाव वाढवत आहे. कमिशन मिळत नसल्याने लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे.

मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, घरात बसा अन् मेलं तर जाळून टाका हा धंदा आता राज्य शासनाने बंद करावा. नाहीतर जनतेतून उद्रेक होईल. येत्या मंगळवारी रयत क्रांती संघटना महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करून गावोगावी खंडणीखोर सरकारचे पुतळे जाळणार आहे, असा इशाराही माजी मंत्री खोत यांनी यावेळी दिला.

.........................................................

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSadabhau Khotसदाभाउ खोत