शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

...तर कोरोनाग्रस्तांना घेऊन 'मातोश्री'त ठाण मांडणार; सदाभाऊंचा ठाकरे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 09:57 IST

अपुऱ्या रेमडेसिविरवरून सदाभाऊ खोत आक्रमक; सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

सातारा : ‘राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने मृत्युदर वाढला आहे. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. येत्या दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा न झाल्यास कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीत ठाण मांडणार आहे,’ असा खणखणीत इशारा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खोत बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, शंकर शिंदे, प्रकाश ऊर्फ सोनू साबळे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी विविध राज्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्र शासनाने दुसरी लाट येणार म्हणून डांगोरा पिटला, पण त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. ऑक्सिजन प्लँट, औषध खरेदी, आरोग्य विभागात भरती करायला हवी होती. रस्ते किंवा इतर कामे करण्यापेक्षा माणसं वाचवायला हवी होती.

रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काही कंपन्यांबरोबरच करार केला. मात्र, राज्य शासन ६५० रुपये किंमत म्हणत आहे, तर कंपन्या १२५० रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत, असे सांगून माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राज्याने इंजेक्शन खरेदी केले नाही आणि मेडिकलवाल्यांना घेऊही दिले नाही. याचे कारण स्पष्ट आहे की, औषधनिर्माण मंत्र्यांना यातून खंडणी गोळा करायची होती. तसेच राज्य सरकार कंपन्यांवर दबाव वाढवत आहे. कमिशन मिळत नसल्याने लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे.

मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, घरात बसा अन् मेलं तर जाळून टाका हा धंदा आता राज्य शासनाने बंद करावा. नाहीतर जनतेतून उद्रेक होईल. येत्या मंगळवारी रयत क्रांती संघटना महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करून गावोगावी खंडणीखोर सरकारचे पुतळे जाळणार आहे, असा इशाराही माजी मंत्री खोत यांनी यावेळी दिला.

.........................................................

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSadabhau Khotसदाभाउ खोत