शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

...तर कोरोनाग्रस्तांना घेऊन 'मातोश्री'त ठाण मांडणार; सदाभाऊंचा ठाकरे सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 09:57 IST

अपुऱ्या रेमडेसिविरवरून सदाभाऊ खोत आक्रमक; सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

सातारा : ‘राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन नसल्याने मृत्युदर वाढला आहे. याला संपूर्णपणे ठाकरे सरकार जबाबदार आहे. येत्या दोन दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा न झाल्यास कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीत ठाण मांडणार आहे,’ असा खणखणीत इशारा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खोत बोलत होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, शंकर शिंदे, प्रकाश ऊर्फ सोनू साबळे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपूर्वी विविध राज्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन खरेदी केली. योग्यवेळी योग्य निर्णय घेण्यात आला. मात्र, महाराष्ट्र शासनाने दुसरी लाट येणार म्हणून डांगोरा पिटला, पण त्यादृष्टीने पावले उचलली नाहीत. ऑक्सिजन प्लँट, औषध खरेदी, आरोग्य विभागात भरती करायला हवी होती. रस्ते किंवा इतर कामे करण्यापेक्षा माणसं वाचवायला हवी होती.

रेमडेसिविर इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. काही कंपन्यांबरोबरच करार केला. मात्र, राज्य शासन ६५० रुपये किंमत म्हणत आहे, तर कंपन्या १२५० रुपयांच्या खाली यायला तयार नाहीत, असे सांगून माजी मंत्री सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, राज्याने इंजेक्शन खरेदी केले नाही आणि मेडिकलवाल्यांना घेऊही दिले नाही. याचे कारण स्पष्ट आहे की, औषधनिर्माण मंत्र्यांना यातून खंडणी गोळा करायची होती. तसेच राज्य सरकार कंपन्यांवर दबाव वाढवत आहे. कमिशन मिळत नसल्याने लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलत आहे.

मास्क लावा, सोशल डिस्टन्स पाळा, घरात बसा अन् मेलं तर जाळून टाका हा धंदा आता राज्य शासनाने बंद करावा. नाहीतर जनतेतून उद्रेक होईल. येत्या मंगळवारी रयत क्रांती संघटना महायुतीतील इतर पक्षांशी चर्चा करून गावोगावी खंडणीखोर सरकारचे पुतळे जाळणार आहे, असा इशाराही माजी मंत्री खोत यांनी यावेळी दिला.

.........................................................

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSadabhau Khotसदाभाउ खोत