शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तोंडावरचा मास्क हटला अन् कोरोना वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:35 IST

फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाची आकडेवाडी वाढत असताना जनतेत मास्क व सोशल डिस्टन्सबद्दल गांभीर्य राहिलेले नाही. अनेकांच्या तोंडावरचा मास्क ...

फलटण : फलटण तालुक्यात कोरोनाची आकडेवाडी वाढत असताना जनतेत मास्क व सोशल डिस्टन्सबद्दल गांभीर्य राहिलेले नाही. अनेकांच्या तोंडावरचा मास्क हनुवटीवर आला अन् तालुक्यात कोरोना वाढू लागला आहे. त्यामुळे धास्ती आणखी वाढली आहे.

गेल्या दहा दिवसांत तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

फलटण तालुक्यात मागील पाच ते सहा महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. दररोज सरासरी दहा रुग्ण सापडायचे. राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात सर्वत्र कोरोना रुग्ण वाढत असताना फलटण तालुक्यात रुग्णसंख्या खूपच कमी होती. जनताही निर्धास्त होती. त्यामुळे मास्क वापरण्याचे प्रमाण खूप कमी झाले होते. लग्नसराई समारंभ यामध्येही मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. अनेकांकडे जेवणावळी सुरू झाल्या होत्या. जनतेमध्ये गांभीर्य नसल्याने हळूहळू कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत जाऊन आता फलटण तालुक्यात जवळपास दररोज तीसच्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडू लागले आहेत.

सुरुवातीच्या काळात कोरोनाबद्दल जनतेमध्ये भीती होती. मात्र, कोरोना झाला तर बरा होतो या मानसिकतेतून जनता निर्धास्त होऊ लागली आहे. विशेषत: तरुण पिढी मास्क वापरताना दिसत नाही. पोलीसही ठराविक ठिकाणीच मास्क नसल्यावर कारवाई करताना दिसत आहेत. संपूर्ण फलटण शहरात पोलिसांनी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. प्रशासनाने कठोर उपाय योजना केल्या तर काही प्रमाणात कोरोनाला आळा बसू शकतो. आठवडी बाजार आणि दररोजच्या मंडईमध्ये अनेकजण विना मास्क भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत. काही भाजी विक्रेतेही मास्क वापर करताना दिसत नाहीत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

फलटण नगरपालिकेने सर्व दुकानदारांची कोरोना टेस्ट करण्याचे सुरू केले असून, त्याला दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेक दुकानांमध्येही सोशल डिस्टन्सचे पालन होताना दिसत नाही.

दरम्यान, फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी मास्क वापरावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.