शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

By admin | Updated: February 19, 2016 00:20 IST

शहीद सुनील सूर्यवंशी : मस्करवाडी-कुकुडवाडमधील नागरिकांचा सवाल ; कर्नाटक शासनाला जमलं, महाराष्ट्राला का नाही

कुकुडवाड : मस्करवाडी (कुकुडवाड) येथील वीरजवान हुतात्मा सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. हुतात्मा सूर्यवंशी यांच्या देशप्रेमाला नतमस्तक होण्यासाठी प्रचंड जनशक्ती एकत्र झाली; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस घोषणा न झाल्याने शासनाची माया का बरं आटली? अशी संतप्त प्रतिक्रिया कुकुडवाड नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सियाचीन येथे हिमकडे कोसळून हुतात्मा झालेल्या वीरजवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी मस्करवाडीत आले. घडलेल्या घटनेनंतर पार्थिव प्रत्यक्षात गावी येण्याचा कालावधी व त्याद्वारे झालेले दु:ख कुटुंबीय व ग्रामस्थांसाठी पर्वताएवढे होते. अखेर वीरजवान सुनील यांचे पार्थिव गावी आले आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने सैन्य दलातील जवान तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मस्करवाडीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अंत्यविधी पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी आले अन् गेले. त्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा होईल, हे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री आले नाहीत आणि इतर अनेकजण आले आणि काही आर्थिक मदत जाहीर न करताच निघून गेले.वास्तविक पाहता सियाचीन येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या कर्नाटकचे सुपुत्र हणमंतअप्पा यांना सरकारने २५ लाख, एक भूखंड व कुटुंबातील एकाला शासनाची नोकरी देऊ केली. त्या तुलनेत हुतात्मा सुनीलच्या कुटुंबीयांच्या पदरात काय पडलं, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना कुकुडवाड येथे येण्यास जमले नसले तरी पालकमंत्र्यांनी तरी तशी घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे घडले नसल्याने कुटुंबीय व कुकुडवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)इतरांवर अक्षरश: घोषणांचा पाऊससिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागतात. देशासाठी प्राण बलीदान करणाऱ्या निदड्या छातीच्या सुनिल सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची मात्र शासनाकडून उपेक्षाच झाली. सियाचीनमध्ये शहीद झालेल्या इतर जवानांना आपआपल्या राज्याने आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीच घोषणा जाहीर केली नाही. सूर्यवंशी कुटुंबीय आता उघड्यावर पडले असताना शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या मदतीशीवाय हे कुटुंब दुख: झेलत आहे.