शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

By admin | Updated: February 19, 2016 00:20 IST

शहीद सुनील सूर्यवंशी : मस्करवाडी-कुकुडवाडमधील नागरिकांचा सवाल ; कर्नाटक शासनाला जमलं, महाराष्ट्राला का नाही

कुकुडवाड : मस्करवाडी (कुकुडवाड) येथील वीरजवान हुतात्मा सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. हुतात्मा सूर्यवंशी यांच्या देशप्रेमाला नतमस्तक होण्यासाठी प्रचंड जनशक्ती एकत्र झाली; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस घोषणा न झाल्याने शासनाची माया का बरं आटली? अशी संतप्त प्रतिक्रिया कुकुडवाड नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सियाचीन येथे हिमकडे कोसळून हुतात्मा झालेल्या वीरजवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी मस्करवाडीत आले. घडलेल्या घटनेनंतर पार्थिव प्रत्यक्षात गावी येण्याचा कालावधी व त्याद्वारे झालेले दु:ख कुटुंबीय व ग्रामस्थांसाठी पर्वताएवढे होते. अखेर वीरजवान सुनील यांचे पार्थिव गावी आले आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने सैन्य दलातील जवान तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मस्करवाडीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अंत्यविधी पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी आले अन् गेले. त्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा होईल, हे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री आले नाहीत आणि इतर अनेकजण आले आणि काही आर्थिक मदत जाहीर न करताच निघून गेले.वास्तविक पाहता सियाचीन येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या कर्नाटकचे सुपुत्र हणमंतअप्पा यांना सरकारने २५ लाख, एक भूखंड व कुटुंबातील एकाला शासनाची नोकरी देऊ केली. त्या तुलनेत हुतात्मा सुनीलच्या कुटुंबीयांच्या पदरात काय पडलं, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना कुकुडवाड येथे येण्यास जमले नसले तरी पालकमंत्र्यांनी तरी तशी घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे घडले नसल्याने कुटुंबीय व कुकुडवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)इतरांवर अक्षरश: घोषणांचा पाऊससिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागतात. देशासाठी प्राण बलीदान करणाऱ्या निदड्या छातीच्या सुनिल सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची मात्र शासनाकडून उपेक्षाच झाली. सियाचीनमध्ये शहीद झालेल्या इतर जवानांना आपआपल्या राज्याने आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीच घोषणा जाहीर केली नाही. सूर्यवंशी कुटुंबीय आता उघड्यावर पडले असताना शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या मदतीशीवाय हे कुटुंब दुख: झेलत आहे.