शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

मस्करवाडीचा त्याग उपेक्षितच!

By admin | Updated: February 19, 2016 00:20 IST

शहीद सुनील सूर्यवंशी : मस्करवाडी-कुकुडवाडमधील नागरिकांचा सवाल ; कर्नाटक शासनाला जमलं, महाराष्ट्राला का नाही

कुकुडवाड : मस्करवाडी (कुकुडवाड) येथील वीरजवान हुतात्मा सुनील सूर्यवंशी यांच्या अंत्यविधीसाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. हुतात्मा सूर्यवंशी यांच्या देशप्रेमाला नतमस्तक होण्यासाठी प्रचंड जनशक्ती एकत्र झाली; मात्र त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी कोणतीच ठोस घोषणा न झाल्याने शासनाची माया का बरं आटली? अशी संतप्त प्रतिक्रिया कुकुडवाड नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सियाचीन येथे हिमकडे कोसळून हुतात्मा झालेल्या वीरजवान सुनील सूर्यवंशी यांचे पार्थिव घटनेनंतर तब्बल १३ दिवसांनी मस्करवाडीत आले. घडलेल्या घटनेनंतर पार्थिव प्रत्यक्षात गावी येण्याचा कालावधी व त्याद्वारे झालेले दु:ख कुटुंबीय व ग्रामस्थांसाठी पर्वताएवढे होते. अखेर वीरजवान सुनील यांचे पार्थिव गावी आले आणि प्रचंड जनसागराच्या साक्षीने सैन्य दलातील जवान तसेच पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या साक्षीने मस्करवाडीच्या डोंगर रांगेच्या कुशीत अंत्यविधी पार पडला. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रभाकर घार्गे तसेच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल तसेच प्रशासकीय पदाधिकारी उपस्थित होते. शहीद जवानांच्या अंत्यविधीसाठी मंत्री, पदाधिकारी, अधिकारी आले अन् गेले. त्या कुटुंबीयांसाठी मोठी घोषणा होईल, हे अपेक्षित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार म्हणून बातम्या प्रसिद्ध झाल्याने जनतेच्या अपेक्षा वाढल्या होत्या; मात्र सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री आले नाहीत आणि इतर अनेकजण आले आणि काही आर्थिक मदत जाहीर न करताच निघून गेले.वास्तविक पाहता सियाचीन येथील दुर्घटनेत शहीद झालेल्या कर्नाटकचे सुपुत्र हणमंतअप्पा यांना सरकारने २५ लाख, एक भूखंड व कुटुंबातील एकाला शासनाची नोकरी देऊ केली. त्या तुलनेत हुतात्मा सुनीलच्या कुटुंबीयांच्या पदरात काय पडलं, असा यानिमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांना कुकुडवाड येथे येण्यास जमले नसले तरी पालकमंत्र्यांनी तरी तशी घोषणा करणे गरजेचे होते; मात्र तसे घडले नसल्याने कुटुंबीय व कुकुडवाड ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (वार्ताहर)इतरांवर अक्षरश: घोषणांचा पाऊससिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशसेवा करणाऱ्या वीर जवानांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागतात. देशासाठी प्राण बलीदान करणाऱ्या निदड्या छातीच्या सुनिल सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची मात्र शासनाकडून उपेक्षाच झाली. सियाचीनमध्ये शहीद झालेल्या इतर जवानांना आपआपल्या राज्याने आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीच घोषणा जाहीर केली नाही. सूर्यवंशी कुटुंबीय आता उघड्यावर पडले असताना शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन हातभार लावणे गरजेचे होते. मात्र शासनाच्या मदतीशीवाय हे कुटुंब दुख: झेलत आहे.