शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
4
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
5
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
8
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
9
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
10
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
12
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
13
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
14
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
15
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
16
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
17
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
18
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
19
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ

हुतात्म्यांच्या भुमीतील अंत्यविधी अंधारातच!

By admin | Updated: December 4, 2014 23:43 IST

वडूज स्मशानभुमीची दुरवस्था : स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचीही ओरडच...!

वडूज : आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, या अभंगाला साजेसे विधी व्हावेत, हीच माफक अपेक्षा सर्व स्तरातील लोकांची मरणानंतर असते. परंतु याला अपवाद वडूज येथील स्मशानभुमीच्या दुरवस्थेमुळे दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राज्याला परिचित असणारी हुतात्म्याची भूमी म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात नोंद असणारी वडूजनगरी ही विविध समस्यांमुळे सध्या चर्चेत आहे. परंतु येथील सर्व सोयी-सुविधा बरोबरीनेच मानवाच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी होणारा अंत्यविधी ही विविध समस्यांमुळे चर्चेत असून हा विधी अंधारातच करावा लागत असल्याची शोकांतिका स्मशानभुमीत पहावयास मिळत आहे. हा परिसर स्वच्छ असावा, पाण्याची विजेची समस्या नीटनेटकी असावी, यासाठी प्रारंभी प्रयत्न झाले. याबाबत उदासिनता असल्याचे प्रामुख्याने जाणविले. स्मशानभुमीत जाणाऱ्या रस्त्यालगतच शहरातील दैनंदिन कचरा गोळा करून याच परिसरात टाकला जात आहे.हा कचरा रस्त्यावरच पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येरळा नदीच्या पात्राकडेलाच ही स्मशानभुमी असूनदेखील या ठिकाणी पाण्याची वानवा आहे. स्मशानभुमीपासून हाताच्या अंतरावर विजेचा खांब असूनही अंत्यविधी अंधारातच करावा लागत आहे. या परिसरात बऱ्याचेळा बल्ब बसविण्यात आले. तसेच सौर उर्जेवरचे दिवे याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु काही समाजकंटकांनी याचीही विल्हेवाट लावली. त्यामुळे या सर्व कारणांचा शोध लावणे क्रमप्राप्त बनले आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या वडूजनगरीची लोकसंख्या पाहता ही स्मशानभुमी अंधारापासून मुक्त व सर्व सोयीनीयुक्त असणे काळाची गरज आहे. तसेच वडूज नगरीला जोडणारे उपनगर हे अंतर जादा असल्याने या भागात शववाहिका असणे आवश्यक आहे. तसेच हा परिसर स्वच्छ ठेऊन येथे अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व देखरेखीसाठी कामगारांची आवश्यकता आहे. यासाठी सदर सोय-सुविधांसाठी ग्रामपंचायतीने मानसिकतेत बदल करून ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)आता नाही येणे जाणे..!जसा जन्म तसाच मृत्यू असल्याची जाणीव असूनही त्या क्षणापुरता मानव भावनिक होऊन आपले मत व्यक्त करतो. परंतु निसर्गाच्या या चक्रापुढे हतबल होऊन याच स्मशानभूमीत ‘आता नाही... येणे... जाणे हा अभंग एक सुरात म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. त्यासाठी बदल घडवून ही समशानभूमी व्यवस्थीत करणे, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.