शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

हुतात्म्यांच्या भुमीतील अंत्यविधी अंधारातच!

By admin | Updated: December 4, 2014 23:43 IST

वडूज स्मशानभुमीची दुरवस्था : स्वच्छता आणि पाण्याच्या सोयीचीही ओरडच...!

वडूज : आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा, या अभंगाला साजेसे विधी व्हावेत, हीच माफक अपेक्षा सर्व स्तरातील लोकांची मरणानंतर असते. परंतु याला अपवाद वडूज येथील स्मशानभुमीच्या दुरवस्थेमुळे दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राज्याला परिचित असणारी हुतात्म्याची भूमी म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासात नोंद असणारी वडूजनगरी ही विविध समस्यांमुळे सध्या चर्चेत आहे. परंतु येथील सर्व सोयी-सुविधा बरोबरीनेच मानवाच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणी होणारा अंत्यविधी ही विविध समस्यांमुळे चर्चेत असून हा विधी अंधारातच करावा लागत असल्याची शोकांतिका स्मशानभुमीत पहावयास मिळत आहे. हा परिसर स्वच्छ असावा, पाण्याची विजेची समस्या नीटनेटकी असावी, यासाठी प्रारंभी प्रयत्न झाले. याबाबत उदासिनता असल्याचे प्रामुख्याने जाणविले. स्मशानभुमीत जाणाऱ्या रस्त्यालगतच शहरातील दैनंदिन कचरा गोळा करून याच परिसरात टाकला जात आहे.हा कचरा रस्त्यावरच पसरल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येरळा नदीच्या पात्राकडेलाच ही स्मशानभुमी असूनदेखील या ठिकाणी पाण्याची वानवा आहे. स्मशानभुमीपासून हाताच्या अंतरावर विजेचा खांब असूनही अंत्यविधी अंधारातच करावा लागत आहे. या परिसरात बऱ्याचेळा बल्ब बसविण्यात आले. तसेच सौर उर्जेवरचे दिवे याठिकाणी लावण्यात आले होते. परंतु काही समाजकंटकांनी याचीही विल्हेवाट लावली. त्यामुळे या सर्व कारणांचा शोध लावणे क्रमप्राप्त बनले आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या वडूजनगरीची लोकसंख्या पाहता ही स्मशानभुमी अंधारापासून मुक्त व सर्व सोयीनीयुक्त असणे काळाची गरज आहे. तसेच वडूज नगरीला जोडणारे उपनगर हे अंतर जादा असल्याने या भागात शववाहिका असणे आवश्यक आहे. तसेच हा परिसर स्वच्छ ठेऊन येथे अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य व देखरेखीसाठी कामगारांची आवश्यकता आहे. यासाठी सदर सोय-सुविधांसाठी ग्रामपंचायतीने मानसिकतेत बदल करून ठोस पावले उचलणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)आता नाही येणे जाणे..!जसा जन्म तसाच मृत्यू असल्याची जाणीव असूनही त्या क्षणापुरता मानव भावनिक होऊन आपले मत व्यक्त करतो. परंतु निसर्गाच्या या चक्रापुढे हतबल होऊन याच स्मशानभूमीत ‘आता नाही... येणे... जाणे हा अभंग एक सुरात म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. त्यासाठी बदल घडवून ही समशानभूमी व्यवस्थीत करणे, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे प्रामुख्याने दिसून येत आहे.