शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

विवाह नोंदणी झाली किचकट...

By admin | Updated: February 10, 2015 00:27 IST

साक्षीदारांसह पुरोहितांचा पुरावा : खर्चाबरोबर कागदपत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ

प्रकाश पाटील - कोपार्डे -राज्य शासनाने सर्वच व्यवहार आॅनलाईन केल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात येणारे विविध दाखले मिळविणे सुलभ झाले आहे. यातीलच एक विवाह नोंदणी प्रमाणपत्रांचा दाखला हवा असेल आणि त्याची ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसेल, तर ती नोंद करण्यासाठी मुंबई विवाह (वैदिक पद्धतीने संपन्न झालेले) कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करतानाच दमछाक होते.विवाह झाल्यानंतर त्याची रितसर नोंदणी ग्रामपंचायत कर्मचारी घेत असत. मात्र, सध्या संगणक युग आल्याने जेवढ्या जलद सुविधा मिळत आहेत, तेवढ्या एखाद्या नोंदीत चुका राहिल्यास अथवा नोंद देणे राहिल्यास वसूल केल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये आॅनलाईन सेवा सुरू झाल्याने २६ प्रकारचे दाखले देण्यात आले आहेत. यात जन्म, मृत्यू, दारिद्र्य रेषेखालील रहिवासी, अशा दाखल्यांचा समावेश आहे. यात नोंदणीचा दाखलाही आहे.आॅनलाईन नोंदणीची पद्धत सुरू झाल्यापासून ज्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्रांची गरज आहे व ज्यांच्या नोंदी ग्रामपंचायतीकडे नाहीत त्यांना आता आॅनलाईन नोंदी घेऊन ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देता येते. मात्र, यासाठी लागणारे पुरावे गोळा करताना नाकेनऊ येत आहेत.हे प्रमाणपत्र मिळविताना महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियमन आणि नोंदणी विधेयक १९९८ अन्वये सर्व पुरावे द्यावे लागतात. मुंबई विवाह कायद्याखाली नोंदणी करण्यासाठी वर व वधू दोहोंचेही शाळा सोडल्याचे दाखले, जन्म तारीख दाखले, रेशनकार्ड अथवा रहिवासी दाखला, लग्नपत्रिका ती नसेल, तर तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्र देण्याबरोबर तीन साक्षीदार व पुरोहितांच्या वरील सर्व कागदपत्रांबरोबर १०० रुपयाचे कोर्ट फी तिकीट लावावे लागते. त्याशिवाय विलंब आकारही भरावा लागते.हे सर्व करताना संबंधित व्यक्तीच्या अक्षरश: नाकेनऊ येते. पत्नीचे माहेरकडील नाव कमी करून पतीकडील नाव लावण्यासाठी अक्षरश: कागदपत्रे व साक्षीदार गोळा करताना ‘भीक नको, पण कुत्रं आवर’ अशी अवस्था होते. यासाठी विवाहनोंदणी व प्रमाणपत्रासाठी किमान कागदपत्रांची अट लागू असावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.संगणकीय जगात एका प्रमाणपत्रासाठी आठ ते दहा पुरावे गोळा करून विवाहनोंदणी करताना अक्षरश: दमछाक होते. हे थांबवावे अथवा कमी कागदोपत्री पुरावे देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, जेणेकरून सुलभ सेवा हा उद्देश सफल होईल.- सर्जेराव पाटील, कोपार्डे