शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत धान्याची आवक टिकून, दरही स्थिर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST

सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, फलटण बाजार समितीत अजूनही मोठ्या प्रमाणात धान्य आवक नाही. ज्वारी, बाजरी, ...

सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असला तरी, फलटण बाजार समितीत अजूनही मोठ्या प्रमाणात धान्य आवक नाही. ज्वारी, बाजरी, गहू आदींची आवक टिकून असून दरही स्थिर आहे. सध्या बाजार समितीत बाजरीला दर कमी असून ज्वारीला क्विंटलला साडेतीन हजारापर्यंत भाव मिळत आहे.

भारत देश कृषिप्रधान आहे. येथील शेतकरी विविध पिके घेतो. उत्पादित शेतीमाल स्थानिक स्तरावर तसेच काही दुकानदारांना विकण्यात येत, तर पुढे दर मिळेल, या आशेने काही मालाची साठवणूक करण्यात येते. त्यानंतर काहीवेळा हा शेतीमाल बाजार समितीत नेऊन विकला जातो. सातारा जिल्ह्याचा विचार करता, येथील खरीप हंगाम मोठा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत खरीप क्षेत्र आहे. खरीप हंगामाची तयारी करताना शेतकरी साठवून ठेवलेला शेतीमाल बाजार समितीत विकतो. त्यातून आलेल्या पैशातून बियाणे, खते आदींची खरेदी करण्यात येते. छोटे शेतकरी खरीप हंगामापूर्वी बाजार समितीत अधिक करून शेतीमाल आणतात.

फलटण बाजार समितीत दर रविवारी धान्य खरेदी आणि विक्री होते. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, खंडाळा, तर पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातूनही धान्य येते.

..........

आठवड्याला होणारी सरासरी आवक क्विंटलमध्ये...

ज्वारी २००, बाजरी ५०, गहू २५०, मका १२५

............

प्रतिक्रिया

कोणाला काय वाटते...

फलटण बाजार समितीत दर रविवारी धान्य खरेदी व विक्री व्यवहार होतात. खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी धान्य घेऊन येत आहेत. पण, अजूनही मोठ्या प्रमाणात आवक नाही. तसेच धान्याचे दर स्थिर आहेत.

- शंकर सोनवलकर,

सचिव, फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती

............

खरीप किंवा रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतकरी उत्पादित केलेला शेतीमाल काही प्रमाणात बाजारात विकतो. तसेच काही साठवणूक करून दर आल्यानंतर विकतो. सध्या शेतकरी खरीप हंगामाची तयारी करू लागलाय. बाजार समितीत धान्य आणत आहे. बाजार समितीत सध्या तरी धान्य दर टिकून आहे.

- चेतन घडिया, धान्य खरेदीदार

.........................

शेतकरी म्हणतात...

दरवर्षी शेतकरी खरीप व रब्बी हंगामात विविध पिके घेतो. जादा उत्पन्न मिळाले की त्याची विक्री करतो. कोणी जागेवर धान्य विक्री करतो, तर काहीवेळा कोणत्याही बाजार समितीत धान्य विक्रीसाठी नेले जाते. सध्या बाजार समितीत दर वाढलेला दिसत नाही. तरीही धान्यविक्री करून खरिपाची तयारी करावी लागणार आहे.

- ठकाजी काळे, शेतकरी

..................................

गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे उत्पादनही चांगले मिळाले. आतापर्यंत काही धान्य विकले आहे, तर काही प्रमाणात धान्याची साठवणूक केली होती. पण, आता खरीप हंगाम जवळ आला असल्याने दर काहीही मिळो, धान्य विकून चार पैसे गोळा केले पाहिजेत.

- साधू जाधव, शेतकरी

फोटो दि.०६बाजार समिती फोटो नावाने...

फोटो ओळ :

फलटण बाजार समितीत धान्यासह इतर शेतीमालाची आवक चांगली होत आहे.

\\\\\\\\\\\\\\\\\\\