शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

निर्बंध झुगारून बाजारपेठ गजबजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता ...

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता व्यापारी, विक्रेते व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाचे निर्बंध झुगारून सोमवारी सातारा शहरातील काही दुकाने पूर्ण खुली करण्यात आली तर काही छुप्या पद्धतीने सुरू होती. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली.

राज्यासह सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला. या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले तर मृतांची संख्याही अधिक होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून टाळेबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यत सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. बाधितांची संख्या हळूहळू कमी झाल्याने निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पुन्हा खुली करण्यात आली. मात्र, काही दिवसांत निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाºयांकडून परवानगी देण्यात आली आहे.

सततच्या निर्बंधांमुुळे जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार हतबल झाले आहेत. बॅँका, पतसंस्थांचे कर्ज, वीज बिल, कर्मचाºयांचे पगार व उदनिर्वाह करणे कठीन बनू लागले आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यपाºयांनी मागणी आहे. मात्र, जिल्हाधिकाºयाकंडून याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे व्यापारी व दुकानदार टाळेबंदीचे निर्बंध झुगारून दुकाने उघडू लागले आहेत. सोमवारी शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही काही प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे पोवई नाका, कर्मवीर पथ, खणआळी, पाचशे एक पाटी, मोती चौक येथे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड पहायला मिळाली.

(चौकट)

जबाबदारी भान ओळखा...

कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे की नागरिक याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. केवळ प्रशासनाावर अवलंबून राहता नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने प्रशासनाला कठोर भूमीका घ्यावी लागत आहे.