शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

निर्बंध झुगारून बाजारपेठ गजबजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता ...

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता व्यापारी, विक्रेते व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाचे निर्बंध झुगारून सोमवारी सातारा शहरातील काही दुकाने पूर्ण खुली करण्यात आली तर काही छुप्या पद्धतीने सुरू होती. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली.

राज्यासह सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला. या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले तर मृतांची संख्याही अधिक होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून टाळेबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यत सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. बाधितांची संख्या हळूहळू कमी झाल्याने निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पुन्हा खुली करण्यात आली. मात्र, काही दिवसांत निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाºयांकडून परवानगी देण्यात आली आहे.

सततच्या निर्बंधांमुुळे जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार हतबल झाले आहेत. बॅँका, पतसंस्थांचे कर्ज, वीज बिल, कर्मचाºयांचे पगार व उदनिर्वाह करणे कठीन बनू लागले आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यपाºयांनी मागणी आहे. मात्र, जिल्हाधिकाºयाकंडून याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे व्यापारी व दुकानदार टाळेबंदीचे निर्बंध झुगारून दुकाने उघडू लागले आहेत. सोमवारी शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही काही प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे पोवई नाका, कर्मवीर पथ, खणआळी, पाचशे एक पाटी, मोती चौक येथे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड पहायला मिळाली.

(चौकट)

जबाबदारी भान ओळखा...

कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे की नागरिक याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. केवळ प्रशासनाावर अवलंबून राहता नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने प्रशासनाला कठोर भूमीका घ्यावी लागत आहे.