शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

निर्बंध झुगारून बाजारपेठ गजबजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता ...

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्ह्यात संचारबंदीचे निर्बंध पुन्हा एकदा कठोर करण्यात आले आहेत. मात्र, सततच्या निर्बंधांमुळे आता व्यापारी, विक्रेते व दुकानदार मेटाकुटीला आले आहेत. प्रशासनाचे निर्बंध झुगारून सोमवारी सातारा शहरातील काही दुकाने पूर्ण खुली करण्यात आली तर काही छुप्या पद्धतीने सुरू होती. शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने बाजारपेठ गर्दीने गजबजून गेली.

राज्यासह सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: उद्रेक झाला. या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने नवे उच्चांक गाठले तर मृतांची संख्याही अधिक होती. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडून टाळेबंदी लागू करण्यात आली. केवळ अत्यावश्यत सेवा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. बाधितांची संख्या हळूहळू कमी झाल्याने निर्बंध शिथिल करून बाजारपेठ पुन्हा खुली करण्यात आली. मात्र, काही दिवसांत निर्बंध पुन्हा कठोर करण्यात आले. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास जिल्हाधिकाºयांकडून परवानगी देण्यात आली आहे.

सततच्या निर्बंधांमुुळे जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार हतबल झाले आहेत. बॅँका, पतसंस्थांचे कर्ज, वीज बिल, कर्मचाºयांचे पगार व उदनिर्वाह करणे कठीन बनू लागले आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करून बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी व्यपाºयांनी मागणी आहे. मात्र, जिल्हाधिकाºयाकंडून याबाबत अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे व्यापारी व दुकानदार टाळेबंदीचे निर्बंध झुगारून दुकाने उघडू लागले आहेत. सोमवारी शहरातील अत्यावश्यक सेवेसह इतर दुकानेही काही प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे पोवई नाका, कर्मवीर पथ, खणआळी, पाचशे एक पाटी, मोती चौक येथे नागरिकांची खरेदीसाठी झुंबड पहायला मिळाली.

(चौकट)

जबाबदारी भान ओळखा...

कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास प्रशासन जबाबदार आहे की नागरिक याची जाण नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. फिजिकल डिस्टन्सचे पालन करा, मास्क, सॅनिटायझरचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा अशा सूचना प्रशासनाकडून सातत्याने केल्या जात आहेत. मात्र, नागरिक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनाची साखळी तुटण्याचे नाव घेईना. केवळ प्रशासनाावर अवलंबून राहता नागरिकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने प्रशासनाला कठोर भूमीका घ्यावी लागत आहे.