शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जैन साधूंच्या हत्येच्या निषेधार्थ फलटणमध्ये मोर्चा; शहर बंद ठेवत केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2023 22:38 IST

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कामकुमारनंदजी महाराज यांची हत्या काही दिवसांपूर्वी झाली असून, पोलिस जैन साधू कामकुमारनंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : आचार्य श्री १०८ कामकुमारनंदजी महाराज यांच्या झालेल्या निर्घृण हत्येबाबत फलटणमधील सकल जैन समाजाकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कामकुमारनंदजी महाराज यांची हत्या काही दिवसांपूर्वी झाली असून, पोलिस जैन साधू कामकुमारनंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. या हत्येने देशात सर्वत्र खळबळ माजली आहे. सर्वत्र याचा निषेध करण्यात येत आहे. फलटणमध्ये दि. १२ रोजी सकाळी शहरातून सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.

जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये असणाऱ्या शाळा या वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधार करण्यात यावा, जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना सध्या काही समाज घटकांकडून जैन गुरुंवर प्राणघातक हल्ला करण्यात येत असून, गत पाच वर्षांमध्ये हजारो धर्मगुरुंचे बळी गेले आहेत. त्यामुळे धर्मगुरुंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दीपासून ते दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत पोलिस संरक्षण मिळावे. या कटातील आरोपी हे कर्नाटकसह इतर राज्यातील असल्याबाबत विविध माध्यमातून समजत असल्याने हा तपास कर्नाटक पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर जैन सोशल ग्रुप, अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक समिती अनुप शहा, सुमित दोशी, यशराज गांधी यांच्या सह्या आहेत.