शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

ऐन दुष्काळातही अनेक गावं जलयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:56 IST

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त ...

स्वप्नील शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दुष्काळी खटाव तालुक्यातील जायगाव, भोसरे व खबालवाडी या तिन्ही गावांची जलयुक्त शिवार योजनेत समावेश झाला. त्यात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत ग्रामस्थांनी श्रमदान करून मातीनाल बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी उभारली. या केलेल्या कामामुळे गावची पाणी साठवण क्षमता वाढली आहे.सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. त्यात औंध परिसरात तर दरवर्षी पाण्याचे जास्त दुर्भिक्ष जाणवत असते. दरवर्षी डिसेंबर महिन्यांपासूनच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. तसेच जनावरांच्या चाऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण हे चित्र पालटण्याचा निर्धार परिसरातील ग्रामस्थांनी केला. त्यात औंध परिसरातील जायगाव, भोसरे आणि खबालवाडी आदी गावांचा शासनाकडून जलयुक्त शिवार योजनेत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये ओढे-नाल्यांचे रुंदीकरण आणि सिमेंट बंधारे उभारण्यात आले. दरम्यान, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेस सुरुवात झाली. यातही ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रमाणे सहभाग नोंदविला.स्पर्धेच्या सुरुवातीपासून गावांमध्ये लोकवर्गणी आणि श्रमदान करून मोठ्या प्रमाणात ‘माथा ते पायथा’ अशा प्रकारे जलसंधारणीची कामे केली. दोन वर्षे केलेल्या कामानंतर पडलेल्या पावसामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी झाले. त्याचा गावांना चांगला परिमाण झाला. मार्च महिन्यातही या गावांमधील बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा उपलब्ध आहे.ताळेबंदामुळेटिकलं पाणीऔंध परिसरातील जायगाव, भोसरे व खबालवाडी गावे जलसंधारणाची कामे करून थांबली नाही. तर गावांनी उपलब्ध पाण्यांचा प्रभावी वापर करण्यासाठी ताळेबंद आखला. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करत सूक्ष्म सिंचनाचा वापर केला. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न तर वाढलेच त्याचबरोबर गावाची पाणीटंचाई संपण्यास मदत झाली आहे.