शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

अनेक गावांत तंटामुक्त अभियान ढेपाळले

By admin | Updated: September 15, 2014 23:26 IST

अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री

सणबूर : शासनाने ग्रामस्वच्छता अभियान निर्मल ग्राम या अभियानाप्रमाणेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र, या अभियानात अनेक अडथळे येत आहेत़ गावाच्या चावडीतच या अभियानाला आव्हानांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील भांडणे गावातच मिटावीत, किरकोळ वादामुळे ग्रामस्थांचा वेळ व पैसा वाया जाऊ नये आणि गावात शांतता प्रस्थापित होऊन सलोखा वाढावा, यासाठी शासनाने तंटामुक्त गाव अभियान सुरू केले़ मात्र हे अभियान राबविण्यात राजकीय गटतट प्रामुख्याने अडथळा ठरत आहेत़ गटातटाच्या वादामुळेच ग्रामस्थांतील अनेक तंटे पोलीस ठाण्यात पोहोचत आहेत. तसेच काही वाद न्यायालयातही गेले आहेत़ ग्रामपंचायतींमधील सत्ताधारी गट दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांना तंटामुक्त समितीत स्थान देत नाहीत़ तेथूनच खरी तंट्याला सुरुवात होते. तंटामुक्तीसाठी आयोजित केलेल्या सभेतही वाद झाले आहेत़ सध्या अनेक तंटामुक्त समित्या फक्त कागदोपत्री उरल्या आहेत. त्यांच्याकडून कसलीही कार्यवाही होताना दिसत नाही. राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने समितीतील पदाधिकारी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)