शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

येरळाच्या पुनरुज्जीवनासाठी सरसावले अनेकजण

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

पुसेगाव : तज्ज्ञांची बैठक; मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार

पुसेगाव : खटाव तालुक्यातील म्हस्कोबाच्या डोंगरात उगम पावलेल्या येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून ती बारमाही प्रवाही राहावी, यासाठी जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व राज्य शासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबाबतचा मास्टर प्लॅन करण्यासंबंधी तज्ज्ञ लोकांची येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टमध्ये बैठक पार पडली. यावेळी सर्वांनीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जलबिरादरीचे प्रभाकर बंदेकर, संघटक सुनील जोशी, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, तहसीलदार विवेक साळुंखे, लघु सिंचनचे उपविभागीय अधिकारी एस. व्ही. मस्के, पुसेगावच्या सरपंच मंगल जाधव, बाळासाहेब इंगळे, प्रकाश जाधव, जोतिराम शिंदे, हणमंत शिंदे, मोळचे श्रीकांत घोरपडे, रामराव पवार, हणमंतराव गायकवाड, प्रल्हाद सावंत, लघु सिंचनचे शाखा अभियंता डी. आर. पाटील, नवनाथ साळुंखे उपस्थित होते. येरळा नदी कायमस्वरूपी प्रवाही राहावी, यासाठी नदीच्या उगम स्थानापासून सिमेंट बंधारे, खोलीकरण व रुंदीकरण करून पाणी टंचाईवर कायमची मात करण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. सुनील जोशी म्हणाले, ‘डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात राज्य शासनाची मदत न घेता केवळ लोकसहभागातून सात नद्यांवर ११ हजार बंधारे बांधून त्या बारमाही प्रवाही केल्या. येरळा नदीच्या उगमापासून ३० किलोमीटर अंतरापर्यंतचा पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.’ डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘खटाव तालुका कायमस्वरूपी दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याठिकाणी शाश्वत पाण्याची सोय नसल्यामुळे पावसाच्या पाण्यावरच येथील शेती व्यवसाय सुरू असतो. येरळा नदीचे पुनरुज्जीवन करून बारमाही प्रवाही करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंह राणा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, शासन व प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार येरळा नदीचे खोलीकरण, रुंदीकरणासाठी श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करेल.’ (वार्ताहर) येरळेसाठी अनेकांचे सहकार्य लाभणार...४या कार्यक्रमात पुसेगाव व परिसरात पडणाऱ्या पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत कसे मुरविले पाहिजे. येरळा नदीचे खोलीकरण तसेच रुंदीकरण, बंधाऱ्यात अडविलेले पाणी कसे मुरविले जाईल, याविषयी अनेकांनी आपापली मते मांडून चर्चेत सहभाग नोंदविला. येरळा नदी बारमाही वाहण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले.