शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

जिल्ह्यातील अनेक ‘माळीण’ भयभीतच

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

‘लोकमत’ची पाहणी

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव कड्याखाली पूर्ण गाडले गेल्याच्या घटनेला गुरुवारी (दि. ३०) वर्ष पूर्ण होत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत माळीणसदृश स्थिती कायम आहे. तेथील गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे आढळून आले असून, बोर्गेवाडी वगळता वर्षभरात प्रशासन ठोस उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहे.डोंगर अरणे, खचणे, मुरुम मोकळा होऊन शिळा सुट्या होणे या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली असलेल्या गावांमध्ये प्रशासन हव्या तेवढ्या वेगाने पोहोचले नसल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील बोर्गेवाडीतील बहुतांश ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, अशा प्रकारे इतर गावांमध्येही लगबगीने हालचाली करण्याची गरज दिसून आली आहे. (लोकमत चमू)‘लोकमत’ची पाहणीमाळीण दुर्घटना घडली त्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ‘माळीण’ गावे शोधून काढली होती. कड्याच्या खाली किंवा तुटणाऱ्या कड्यांवर राहणाऱ्या या गावांची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे सचित्र दर्शन त्याचवेळी घडविले होते. काही गावांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी भेटीही दिल्या होत्या. ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून काढण्यासाठी ठोस उपाय झाले का, हे पाहण्यासाठी ‘लोकमत चमू’ने यातील काही गावांना भेटी देऊन पाहणी केली.