शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनेक ‘माळीण’ भयभीतच

By admin | Updated: July 30, 2015 00:31 IST

‘लोकमत’ची पाहणी

सातारा : पुणे जिल्ह्यातील माळीण गाव कड्याखाली पूर्ण गाडले गेल्याच्या घटनेला गुरुवारी (दि. ३०) वर्ष पूर्ण होत असताना सातारा जिल्ह्यातील अनेक गावांत माळीणसदृश स्थिती कायम आहे. तेथील गावकरी अद्याप भीतीच्या छायेखाली असल्याचे आढळून आले असून, बोर्गेवाडी वगळता वर्षभरात प्रशासन ठोस उपाय योजण्यात अयशस्वी ठरले आहे.डोंगर अरणे, खचणे, मुरुम मोकळा होऊन शिळा सुट्या होणे या नैसर्गिक आपत्तींच्या छायेखाली असलेल्या गावांमध्ये प्रशासन हव्या तेवढ्या वेगाने पोहोचले नसल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले आहे. पाटण तालुक्यातील बोर्गेवाडीतील बहुतांश ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात प्रशासन यशस्वी झाले असून, अशा प्रकारे इतर गावांमध्येही लगबगीने हालचाली करण्याची गरज दिसून आली आहे. (लोकमत चमू)‘लोकमत’ची पाहणीमाळीण दुर्घटना घडली त्याच दिवशी ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ‘माळीण’ गावे शोधून काढली होती. कड्याच्या खाली किंवा तुटणाऱ्या कड्यांवर राहणाऱ्या या गावांची स्थिती अत्यंत भयावह असल्याचे सचित्र दर्शन त्याचवेळी घडविले होते. काही गावांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी भेटीही दिल्या होत्या. ग्रामस्थांना भीतीच्या छायेतून काढण्यासाठी ठोस उपाय झाले का, हे पाहण्यासाठी ‘लोकमत चमू’ने यातील काही गावांना भेटी देऊन पाहणी केली.