शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अनेक धरणग्रस्त गावे पाण्यापासून वंचित

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

वांग-मराठवाडीतील स्थिती : शासकीय खर्चाने पाणी उचलून देण्याची गरज

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या ४६ गावांपैकी काही गावे अशी आहेत की शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी उचलून दिले नाही तर ती गावे पाण्यापासून कायमच वंचित राहणार आहेत़ जानुगडेवाडी, शितपवाडी, मंंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, धामणी, कुंभारगाव अशा गावांना पाण्याचा लाभ होणार नाही़ परंतु अशा गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी स्लॅबमुळे धरणग्रस्तांनी काढून घेतलेल्या आहेत़ शासनाने अशा गावातील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ यासाठी वांगच्या धरणग्रस्तांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी त्यांनी लढा कायम ठेवला असला तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही़ यामधील वस्तुस्थिती पाहिली तर घोटील हे गाव ९०•टक्के स्थलांतरित झाले आहे़धरणाच्या बाजूला असलेल्या जाधववाडी व मराठवाडी गावांची अंशत: जमीन धरणाच्या पाण्यामध्ये गेली असल्यामुळे; परंतु त्यांचे घर किंवा गावठाण प्रत्यक्षात बाधित न झाल्यामुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणामध्ये शासनाने शेड बांधून केले आहे़ ज्या ठिकाणी जाधववाडी व मराठवाडी पुनर्वसन झाले आहे़ त्याठिकाणी ते अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत़ त्यांना त्या ठिकाणी प्लॉट व जमिनी दिल्या आहेत़ ते त्या ठिकाणी येऊन-जाऊन शेती करत आहेत़ तसेच मेंढ येथील सहा कुटुंबे प्रथम घळभरणीमध्ये प्रत्यक्ष बाधित झाल्याने ती कुटुंबे घारेवाडी (ता़ कऱ्हाड) येथील गावठाणात स्थलांतरित झाली आहेत़सध्या वांग-मराठवाडी धरणातील संपूर्ण पाणी नदीपात्रामधून वाहून जात असल्यामुळे पुढील काळात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी या लाभक्षेत्रातील गावामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे वाहून जात असलेले पाणी साठवून ठेवले तर पाणी टंचाईवर मात करता येईल, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे़ यासाठी शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ (वार्ताहर)उठाव करण्याची गरजवांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या आहेत, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी कसे देता येईल़ याबाबतचे प्रस्तावही शासनाला दिले गेलेले दिसत नाहीत़ परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचललेली दिसत नाहीत़ परंतु लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यासाठी उठाव करण्याची गरज आहे़