शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

अनेक धरणग्रस्त गावे पाण्यापासून वंचित

By admin | Updated: November 7, 2014 00:10 IST

वांग-मराठवाडीतील स्थिती : शासकीय खर्चाने पाणी उचलून देण्याची गरज

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या ४६ गावांपैकी काही गावे अशी आहेत की शासनाने त्यांना शासकीय खर्चाने पाणी उचलून दिले नाही तर ती गावे पाण्यापासून कायमच वंचित राहणार आहेत़ जानुगडेवाडी, शितपवाडी, मंंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, धामणी, कुंभारगाव अशा गावांना पाण्याचा लाभ होणार नाही़ परंतु अशा गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी स्लॅबमुळे धरणग्रस्तांनी काढून घेतलेल्या आहेत़ शासनाने अशा गावातील शेतकऱ्यांना शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ यासाठी वांगच्या धरणग्रस्तांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी त्यांनी लढा कायम ठेवला असला तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही़ यामधील वस्तुस्थिती पाहिली तर घोटील हे गाव ९०•टक्के स्थलांतरित झाले आहे़धरणाच्या बाजूला असलेल्या जाधववाडी व मराठवाडी गावांची अंशत: जमीन धरणाच्या पाण्यामध्ये गेली असल्यामुळे; परंतु त्यांचे घर किंवा गावठाण प्रत्यक्षात बाधित न झाल्यामुळे धरणग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणामध्ये शासनाने शेड बांधून केले आहे़ ज्या ठिकाणी जाधववाडी व मराठवाडी पुनर्वसन झाले आहे़ त्याठिकाणी ते अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत़ त्यांना त्या ठिकाणी प्लॉट व जमिनी दिल्या आहेत़ ते त्या ठिकाणी येऊन-जाऊन शेती करत आहेत़ तसेच मेंढ येथील सहा कुटुंबे प्रथम घळभरणीमध्ये प्रत्यक्ष बाधित झाल्याने ती कुटुंबे घारेवाडी (ता़ कऱ्हाड) येथील गावठाणात स्थलांतरित झाली आहेत़सध्या वांग-मराठवाडी धरणातील संपूर्ण पाणी नदीपात्रामधून वाहून जात असल्यामुळे पुढील काळात शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी या लाभक्षेत्रातील गावामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे वाहून जात असलेले पाणी साठवून ठेवले तर पाणी टंचाईवर मात करता येईल, यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे़ यासाठी शासकीय खर्चाने उपसासिंचनाद्वारे पाणी देण्याची गरज आहे़ (वार्ताहर)उठाव करण्याची गरजवांग-मराठवाडी धरणग्रस्तांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत ज्या ठिकाणी धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या आहेत, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीला पाणी कसे देता येईल़ याबाबतचे प्रस्तावही शासनाला दिले गेलेले दिसत नाहीत़ परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस पावले उचललेली दिसत नाहीत़ परंतु लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही यासाठी उठाव करण्याची गरज आहे़