शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

मनोमिलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:28 IST

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन याच कृष्णा काठावर रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथे कृष्णा ...

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन याच कृष्णा काठावर रेठरे बुद्रूक (ता. कराड ) येथे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. ते राज्याच्या मंत्रिमंडळात गेल्यावर या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांचे लहान बंधू जयवंतराव भोसले यांनी सांभाळली. भोसले या कारखान्याचे सलग तीस वर्षे अध्यक्ष राहिले.

अवघा कृष्णाकाठ ''यशवंत हो जयवंत हो'' हे गीत गुणगुणत असताना या बंधू प्रेमाला दृष्ट लागली. अन दोन सख्ख्या भावात सत्तासंघर्ष सुरू झाला. सन १९८९ साली यशवंतराव मोहिते यांच्या रयत पॅनलने जयवंतराव भोसले यांच्या सहकार पॅनलचा पराभव करीत पहिले ऐतिहासिक सत्तांतर केले. हा दोन भावातील संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यांच्या वारसदारांनीही हा संघर्ष तसाच पुढे कायम ठेवलेला दिसतोय.

पहिल्या सत्तांतरानंतर यशवंतराव मोहिते यांचे पुतणे मदनराव मोहिते यांनी सलग दहा वर्षे कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर डॉ. पतंगराव कदम व मदनराव मोहिते यांनी गुरुदक्षिणा म्हणून यशवंतराव मोहिते यांचे पुत्र डॉ. इंद्रजित मोहिते यांना कारखान्याचे अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त करून दिली. या प्रत्येक निवडणुकीत मोहिते भोसले संघर्ष पाहायला मिळाला. पण इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणुकीत सत्ताबदल झाला. भोसले गट सत्तेवर आला. डॉ. सुरेश भोसले अध्यक्ष झाले.

दरम्यानच्या काळात सन २००७ च्या सुमारास भारती विद्यापीठाचे प्रमुख डॉ. पतंगराव कदम यांनी मोहिते भोसले ही दोन कुटुंबे एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला. कृष्णाकाठाने पहिले ''मनोमिलन'' पाहिले. त्यानंतर २००९-१०साली कारखान्याची निवडणूक लागली. हे मनोमिलन निवडणुकीला सामोरे गेले तेव्हा नवख्या असणाऱ्या अविनाश मोहित्यांनी संस्थापक पॅनल रिंगणात उतरविले अन् कोणाच्या ध्यानीमनी नसताना सत्तांतराचा ''नारळ'' फुटला. तेव्हा मोहिते भोसलेंचे हे मनोमिलन सभासदांच्या पचनी पडलेले नाही हे सार्‍यांनीच अनुभवले. त्यानंतर हे मनोमिलन फारकाळ टिकले नाही ही बाब वेगळीच !

आज कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या मनोमिलनाची चर्चा सुरू आहे. डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाची ही चर्चा आहे. विशेष म्हणजे कदम परिवारातीलच सदस्य, विद्यमान सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्याबाबत सारख्या बैठका सुरू आहेत. मनोमिलनाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच आहे. ''राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र वा शत्रू नसतो'' हे अगदी खरे आहे. त्यामुळे जर हे मनोमिलन झाले तर नवल वाटायला नको. पण हे नवे मोहिते यांचे मनोमिलन सभासदांच्या किती व कसे पचनी पडेल हे सांगणे अवघडच आहे. तूर्तास या नव्या मनोमिलनासाठी शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

प्रमोद सुकरे; कराड