शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘खास’ माणसांच्या हाती ‘आम’चा झाडू!

By admin | Updated: November 22, 2014 00:08 IST

खप वाढला : स्वच्छ भारत अभियानामुळे नगांवरची विक्री डझनावर

सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान राबविण्याची घोषणा ेकेल्यानंतर झाडू बनविणाऱ्यांना आणि विकणाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शासकीय कार्यालयांत ही मोहीम सुरू असल्याने नगांवर खपणारे झाडू अचानक डझनांवर विकत घेतले जाऊ लागले आहेत.लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने सर्वत्र जोरदार प्रचार केला होता. या पक्षाचे निवडणूक चिन्हच ‘झाडू’ हे असल्याने त्यावेळीही झाडूला मोठी मागणी होती. ‘आप’च्या प्रचारवाहनांवर झाडू झळकत होते. पदयात्रा काढणाऱ्या कार्यकर्त्यांच्याही हातात झाडू दिसत होते. नंतर अचानक लुप्त झालेले झाडू आता स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने पुन्हा मोठ्या संख्येने प्रकटले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य अशा सगळ्या ‘खास’ व्यक्तींच्या हाती ‘आम’चा झाडू दिसू लागला आहे. शाळा-महाविद्यालयांचे आवार, शासकीय कार्यालयांचे आवार चकाचक होऊ लागले आहे. स्वच्छता मोहीम सर्वत्र जोमाने राबविली जात असल्याने झाडूला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.जिल्ह्यातील अनेक शहरांत डेंग्यू, हिवताप असे साथींचे आजार गेल्या महिन्यापासून थैमान घालत आहेत. स्वच्छता अभियान राबविण्यास त्यामुळे दुहेरी निमित्त मिळाले आहे. अनेक स्वयंसेवी संस्था स्वच्छतेच्या मोहिमेत उतरल्यामुळे आजार पसरविणाऱ्या विषाणूंच्या नायनाटाबरोबरच शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य राखले जात आहे. परंतु या सर्व घडामोडींचा आर्थिक सुपरिणाम म्हणून झाडू विकणाऱ्यांना चांगला व्यवसाय मिळू लागला आहे. शहरात झाडूंची आवक आणि विक्री चांगलीच वाढली आहे. (प्रतिनिधी)५महाबळेश्वर, पाचगणी, वाई, फलटण या तालुक्यांमध्ये खराटे येथूनच जातात. आमच्या दुकानातील केवळ खराट्यांची दरमहा उलाढाल पंधरा ते वीस हजारांवर जाते. स्वच्छता अभियान सुरू झाल्यापासून खराट्यांच्या उलाढालीत प्रचंड वाढ झाली आहे.- एम. सुनीलकुमार (जादूगार), विक्रेता‘मालवण खराट्या’ला मागणीखराट्यांमध्ये मालवण खराटा, केरळ खराटा आणि महाराष्ट्र खराटा असे तीन प्रकार आहेत. साताऱ्यात मालवण खराट्याला जास्त मागणी आहे. या खराट्याच्या केवळ काड्या सांगलीहून येतात. याला ‘बोरू काडी’ म्हणतात. खराटा साताऱ्यातच तयार केला जातो. प्रकारानुसार खराट्यांच्या किमती पंधरा रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत आहेत. याखेरीज ‘चायनीज खराटा’ नावाचा प्रकार चौपाटीवरील खाद्यपदार्थ बनविण्याचे तवे साफ करण्यासाठी वापरला जातो, तोही येथेच तयार होतो.