शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

बदलत्या हवामानामुळे आंबा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती ...

कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती मोठी होत आहे. परिणामी आंबा बागायत शेतकरी अडचणीत आला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत आंबा पीक कमी झाल्याने दर गडगडण्याची शक्यता असल्याने सामान्य लोकांना मनसोक्त आंब्याची चव चाखता येणार नाही.

काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी आंब्याच्या एका झाडाला दोन ते तीन टप्प्यात मोहर आल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा परिणामी दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात आलेले आंबे ढगाळ वातावरणामुळे गळून पडू लागले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर जळून गेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोर फुल बहरात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे कोणती औषधे फवारण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

कुसूरसह संपूर्ण वांग खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा पिकाची मोठी लागवड केली आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे. नोकरीची वानवा असल्याने अनेक तरुणांनी तुटपुंज्या पाण्याचे योग्य नियोजन करून आंबा झाडांची लागवड केली आहे. वार्षिक पीक असलेल्या या पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने अनेक तरुणांनी पारंपरिक पिके बाजूला ठेवून इस्त्रायल पद्धतीने आंबा लागवड केली आहे. यामध्ये केशर या जातीच्या वाणाला या परिसरातील वातावरण पोषक असल्याने उत्पन्न प्रती वर्षी चांगल्याप्रकारे येत आहे. तर काही शेतकऱ्यांनी हापूस वाणाला पसंती दिली आहे. मात्र, या झाडांना येथील वातावरण योग्य नसल्याने एक आड वर्षाने झाडाला फळ धारणा होत आहे. परिणामी या शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. तर वातावरणातील बदलाचाही फटका बसला आहे.

चौकट :-

झाडांना आंबे लवकर लागावेत, दर चांगला मिळावा म्हणून काही शेतकऱ्यांकडून शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या कल्टार या रासायनिक औषधाचा झाडांना वापर केला जात होता. मात्र, या औषधामुळे अनैसर्गिक पद्धतीने झाडांना मोहोर लवकर येऊन आंबेही लवकर आणि भरपूर प्रमाणात येतात. मात्र, या औषधामुळे झाडांचे आयुष्य कमी होऊ लागले आहे. तर हे आंबे खाणे शरीरला घातक असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

चौकट -:

सेंद्रिय पिकांना वाढती मागणी आणि चांगला भाव मिळू लागल्याने आंब्यांचे पीकही सेंद्रिय पद्धतीने घेणाऱ्या बागायती शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. मात्र, सेंद्रिय आंब्यांना विक्रीसाठी योग्य मार्गदर्शन आणि मार्केट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीमध्ये आंबे विकावे लागत असल्याने सेंद्रिय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या कृषी विभागाकडून याची योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

चौकट-:

रासायनिक शेती ही शरीरासाठी घातक झाली आहे. जास्त उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी रासायनिक खताचा भरपूर वापर करीत आहेत. मात्र, हेच रसायन अन्नातून आपल्या मुलांना देऊन कमजोर करून आजाराला बळी पडण्याचे काम करीत आहेत. हे शेतकऱ्यांना दिसून येत नाही. मात्र, काही शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती केली जात आहे. तसेच फळ बागायतीही माझ्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने शेतकरी जीव ओतून करीत आहेत. प्रत्येक पीक हे सेंद्रिय पद्धतीनेच घेणे काळाची गरज आहे.