शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
4
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
7
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
8
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
9
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
10
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
11
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
12
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
13
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
14
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
15
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
16
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
17
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
18
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
19
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
20
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन

बदलत्या हवामानामुळे आंबा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:41 IST

कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती ...

कुसूर : दिवसेंदिवस हवामानात होणाऱ्या बदलांमुळे आंबा पिक धोक्यात आले आहे. कलमी झाडांसह रायवळ झाडांच्या आंब्याची गळती मोठी होत आहे. परिणामी आंबा बागायत शेतकरी अडचणीत आला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत आंबा पीक कमी झाल्याने दर गडगडण्याची शक्यता असल्याने सामान्य लोकांना मनसोक्त आंब्याची चव चाखता येणार नाही.

काही दिवसांपासून हवामानात होणाऱ्या बदलांमुळे नैसर्गिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी आंब्याच्या एका झाडाला दोन ते तीन टप्प्यात मोहर आल्याने त्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. त्याचा उत्पन्नावर मोठा परिणामी दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात आलेले आंबे ढगाळ वातावरणामुळे गळून पडू लागले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात आलेला मोहोर जळून गेला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मोहोर फुल बहरात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे कोणती औषधे फवारण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे.

कुसूरसह संपूर्ण वांग खोऱ्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा पिकाची मोठी लागवड केली आहे. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या जास्त आहे. नोकरीची वानवा असल्याने अनेक तरुणांनी तुटपुंज्या पाण्याचे योग्य नियोजन करून आंबा झाडांची लागवड केली आहे. वार्षिक पीक असलेल्या या पिकातून चांगले उत्पन्न मिळू लागल्याने अनेक तरुणांनी पारंपरिक पिके बाजूला ठेवून इस्त्रायल पद्धतीने आंबा लागवड केली आहे. यामध्ये केशर या जातीच्या वाणाला या परिसरातील वातावरण पोषक असल्याने उत्पन्न प्रती वर्षी चांगल्याप्रकारे येत आहे. तर काही शेतकऱ्यांनी हापूस वाणाला पसंती दिली आहे. मात्र, या झाडांना येथील वातावरण योग्य नसल्याने एक आड वर्षाने झाडाला फळ धारणा होत आहे. परिणामी या शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडून पडल्याचे दिसून येत आहे. तर वातावरणातील बदलाचाही फटका बसला आहे.

चौकट :-

झाडांना आंबे लवकर लागावेत, दर चांगला मिळावा म्हणून काही शेतकऱ्यांकडून शासनाकडून बंदी घालण्यात आलेल्या कल्टार या रासायनिक औषधाचा झाडांना वापर केला जात होता. मात्र, या औषधामुळे अनैसर्गिक पद्धतीने झाडांना मोहोर लवकर येऊन आंबेही लवकर आणि भरपूर प्रमाणात येतात. मात्र, या औषधामुळे झाडांचे आयुष्य कमी होऊ लागले आहे. तर हे आंबे खाणे शरीरला घातक असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

चौकट -:

सेंद्रिय पिकांना वाढती मागणी आणि चांगला भाव मिळू लागल्याने आंब्यांचे पीकही सेंद्रिय पद्धतीने घेणाऱ्या बागायती शेतकऱ्यांची वाढ झाली आहे. मात्र, सेंद्रिय आंब्यांना विक्रीसाठी योग्य मार्गदर्शन आणि मार्केट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीमध्ये आंबे विकावे लागत असल्याने सेंद्रिय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या कृषी विभागाकडून याची योग्य दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

चौकट-:

रासायनिक शेती ही शरीरासाठी घातक झाली आहे. जास्त उत्पादन मिळण्यासाठी शेतकरी रासायनिक खताचा भरपूर वापर करीत आहेत. मात्र, हेच रसायन अन्नातून आपल्या मुलांना देऊन कमजोर करून आजाराला बळी पडण्याचे काम करीत आहेत. हे शेतकऱ्यांना दिसून येत नाही. मात्र, काही शेतकऱ्यांकडून सेंद्रिय शेती केली जात आहे. तसेच फळ बागायतीही माझ्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने शेतकरी जीव ओतून करीत आहेत. प्रत्येक पीक हे सेंद्रिय पद्धतीनेच घेणे काळाची गरज आहे.