शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

माणगंगेतील बंधारे भरून वाहिले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 13:53 IST

जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

ठळक मुद्देपळशीतील स्थिती दुष्काळी भागातील बळीराजाच्या आशा पल्लवीत जलयुक्तची किमया!रब्बी हंगामाला दिलासा.

दहिवडीदि. 17‌ : जूनच्या सुरुवातीला माणमध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या ओलीवर शेतकºयांनी खरीप हंगामात बाजरी, मका, कांदा व अन्य पिके घेतली होती.  मात्र, ही सर्व पिके पाण्यावाचून करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला होता. पण मागील काही दिवसांपासून गोंदवले, दहिवडीसह परिसरात झालेल्या पावसाने माणगंगेतील बंधारे भरू लागल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

 माण तालुक्यातील पळशी परिसरात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप  हंगाम वाया गेला. असे असलेतरी सध्या तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे माणगंगा नदीवरील बंधारे भरून वाहू लागल्याने बळीराजा सुखावला आहे. सध्या गोंदवले, लोधवडे, मनकर्णवाडी, पळशी, जाशी या गावातील सिंमेट बंधारे पाण्याने भरु लागले आहेत. यामुळे बळीराजा सुखावला असलातरी दमदार पावसाची प्रतीक्षा आहेच. 

पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने व लोधवडे ओढ्याला पाणी वाहू लागल्याने पळशी परिसरातील बंधारे पाण्याने भरून वाहू लागल्याने शेतकºयांना रब्बी हंगामासाठी फायदा होऊ शकतो. मात्र, माणचा पूर्व भागात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. त्या परिसरात नुसतीच रिपरिप सुरू आहे.रब्बी हंगामाला दिलासा...माणगंगा नदीवर गेल्या दोन वर्षांपूर्वी जलयुक्त शिवारमधून झालेल्या साखळी बंधाºयांमध्ये पाणी आले आहे. हे  बंधारे पाण्याने भरून वाहू लागले आहेत. शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर रब्बी हंगामाला याचा फायदा होणार आहे. जलयुक्तची किमया !ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून व भाजपचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र खाडे यांच्या प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवारमधून पळशीमध्ये माणगंगा नदीवर पाच सिंमेट बंधारे साखळी पध्दतीने बांधले आहेत. त्यामुळे सध्या सात किलो मीटरपर्यंत पाणी साचले आहे. मनकर्णवाडी, जाशी, पळशी आदी गावांना याचा मोठा फायदा होणार आहे