शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कोरोनामुक्त गावसाठी व्यवस्थापन समितीने प्रभावी कार्यप्रणाली राबवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील ...

पाचगणी : ‘प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य जपले पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरणे गरजेचे आहे. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील आपत्ती व्यवस्थापन समितीने अधिक प्रभावीपणे कोरोनामुक्त गाव अभियान राबवावे,’ असे आवाहन महाबळेश्वरचे नायब तहसीलदार श्रीकांत तिडके यांनी केले.

महाबळेश्वर तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी आंब्रळ गावाला तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदारांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आंब्रळच्या सरपंच माधुरी आंब्राळे, उपसरपंच उमेश जाधव, तलाठी नीलेश गीते, ग्रामसेवक वैभव काळे, आरोग्य सेविका, आशा प्रमिला आंब्राळे, सरिता आंब्राळे, पोलीस पाटील सुप्रिया आंब्राळे, मुख्याध्यापिका मोरे, ग्रामपंचायत सदस्य विकास जंगम, भानुदास बिरामने, सारिका आंब्राळे, सरिता आंब्राळे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य रवींद्र आंब्राळे, दिलीप आंब्राळे, संदीप आंब्राळे उपस्थित होते.

तिडके म्हणाले, ‘कोरोनाची भीती दूर करणे व आत्मविश्वास निर्माण करणे, कोरोनाची तपासणी वाढविणे, ग्रामीण यंत्रणा सक्रिय करून सक्षम बनविणे आणि स्वच्छता व निर्जंतुकीकरण मोहीम राबविणे या पंचसूत्रीवर आधारित असलेली ‘माझे गाव, कोरोनामुक्‍त गाव’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने आंब्रळ गावात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही.’

तौक्ते चक्रीवादळाने लोकांचे नुकसान झाले, त्याची पाहणी नायब तहसीलदार यांनी जागेवर केली. तिडके यांनी लोकांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. सरपंच माधुरी आंब्राळे यांनी गावातील तीस कुटुंबांना रेशन मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या पाहून घेऊ, असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिले.