शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

कॅन्सरला जिद्दीने हरवणारा माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:19 IST

कॅ न्सरचा आजार झाला’ असं म्हटलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर त्याचा मृत्यूच होणारच, ...

कॅ न्सरचा आजार झाला’ असं म्हटलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर त्याचा मृत्यूच होणारच, असं जणू समीकरणंच बनलं आहे. मात्र, साताऱ्यातील श्रीकांत मसुते या वृद्धाने तोंडाच्या कॅन्सरशी चार वर्षे झुंज देऊन तो शंभर टक्के बरा केला. त्यावरच ते न थांबता तर त्यांनी ‘हॅँड क्रार्फ्ट’ वस्तू बनवण्याचा व्यवसाय सुरू करून पुन्हा जीवनाच्या नव्या इनिंगचा प्रारंभ केला आहे.शरद पवार, युवराज सिंग, मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे आदी सेलिब्रिटींना कॅन्सर झाला. तर त्यांनी परदेशात जाऊन उपचार केला. त्यानंतर त्यांनी पुन्हा आयुष्याला सुरुवात केली. अनेकांना त्यांची उदाहरणे प्रेरणादायी वाटत असतात; पण अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे साताºयातही आहेत. त्यापैकीच श्रीकांत मसुते हे एक कॅन्सरग्रस्त व्यक्ती आहेत.सन २०१० मध्ये मसुते यांच्या जिभेला इन्फेक्शन झाले होते. काही महिने केलेल्या विविध तपासणींमध्ये त्यांना तोंडाचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले. हे समजताच त्यांना व कुटुंबीयांना हादरा बसला. मूळचा कलाकार पिंड असलेल्या या माणसाने कॅन्सर आजाराशी संंबंधित असलेली सर्व पुस्तके वाचून काढली. काही दिवसांनंतर मुंबईतील टाटा कॅॅन्सर रुग्णालयातील उपचारदरम्यान त्यांना दुर्मिळात दुर्मीळ कॅन्सरचा आजार झाल्याचे समजले; पण हा माणूस खचला नाही. त्याच्या पाठीशी त्याची पत्नी राणी मसुते यांच्या खंबीर साथ होती.त्यांनी स्वत: डॉक्टरांच्या स्वाधीन केले. डॉक्टर त्यांच्यावर उपचारांबरोबर संशोधनही करत होते. दरम्यान, उपचाराचा खर्च आणि दैनंदिन खर्च यासाठी लागणाºया पैशांसाठी त्यांनी कलात्मक वस्तू बनवण्याच्या छंदाला व्यावसायिक रूप देण्याचा निर्णय घेतला. उपचार घेत असताना होणाºया मानसिक व शारीरिक त्रासाला तोंड देत असताना कलात्मक वस्तू बनवण्यात ते आपला वेळ खर्ची करत होते. त्यातून त्यांना आर्थिक हातभारही मिळत होता.योगासन, प्राणायमच्या जोरावर संवाद सुरूटाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या रुग्णांनी त्यांची जीप व संपूर्ण दात काढले. त्यामुळे त्यांचे बोलणे आणि चावून खाण्याची पूर्ण प्रक्रिया बंद झाली होती. ते हातवारे किंवा लिहून इतरांशी संवाद साधत होते. तर लिक्विड अन्न पित नित्यनियमाने औषध उपचार सुरू होते. डॉक्टरांच्या उपचारपद्धतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने त्यांचा आजार पूर्णपणे बराच झाला. त्याचबरोबर त्यांनी योगासन, प्राणायम याच्या जोरावर जिभेशिवाय बोलण्यास सुरुवात केली.आज त्यांचा कॅन्सर शंभर टक्के बरा झाला असून, ते कलात्मक वस्तू बनवून त्याची विक्री करत आपला नव्या व्यवसायाला सुरुवात केली. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे त्यांचे दैनंदिन जीवन सुरू आहे.