शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पाटण तालुक्यातील माळीण दुर्लक्षित

By admin | Updated: April 4, 2017 18:00 IST

शासनाच्या भरीव निधीची गरज, कड्याखालच्या बोर्र्गेवाडीचे पुनर्वसन अर्धवटच!

 आॅनलाईन लोकमत

पाटण, दि. ४ : एखाद्या दगडी गुहेत राहतोय की काय? अशा अवस्थेत वास्तव्यास असलेल्या मेंढोशी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या बोगेर्वाडीची धोकादायक कड्याखालून सुटका झालेली नाही. प्रत्येक दिवश मृत्यू उशाला घेऊन तेथील ग्रामस्थ जगत आहेत. बोगेर्वाडीच्या नवीन पुनर्वसित वसाहतीकडे शासनाचे म्हणावे तितके लक्ष नसल्यामुळे पुनर्वसन अर्धवटच आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव भुस्खलनात रात्री गायब झाले. त्यानंतर लोकमतने जिल्ह्यातील सातारा, पाटण, जावळी या दुर्गम तालुक्यांतील माळीण गावे शोधून काढली. तेथील लोकांचे प्रश्न प्रकषार्ने मांडले. त्यानंतर या गावांचे पुनर्वसन करण्याची आश्वासने दिली गेली. त्यानंतर माळीणचे पुनर्वसन झाले. तेथील शाळेची इमारत सोशल मीडियावर फिरत आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील माळीण गावाची काय अवस्था आहे, हे पाहिले असता पुनर्वसन झालेले नसल्याचेच समोर आले.

पुणे जिल्ह्यातील दुर्घटना झाली त्यावेळी पाटण तालुक्यातील बोगेर्वाडीची धास्ती सर्वांनाच लागून राहिली होती. तेथील ६१ कुटुंबे कड्याकपारीखाली राहत होती. कधी कडा कोसळेल आणि मोठी आपत्ती ओढावेल, हे शासनासह सर्वांनाच माहीत होते. माळीण दुर्घटनेपूवीर्ही बोगेर्वाडीचा प्रश्न गाजला होता. त्यासाठी माजी आमदार असो की विद्यमान दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले. आजच्या स्थितीत ६१ पैकी ४१ कुटुंबांचे त्याच गावच्या हद्दीत पुनर्वसन झाले. आता फक्त दोन घरे त्या जुन्या कड्याखालच्या वस्तीत राहत आहेत. कारण त्यांची आर्थिक स्थिती घर बांधण्यासारखी नाही. शासनाने बोगेर्वाडीकरांना भूखंड दिला आहे. मात्र, घरे बांधण्यासाठी भरीव मदत केलेली नाही. नवीन पुनर्वसन गावठाणात रस्ते, नळयोजना अद्याप रोडावलेल्या अवस्थेत आहेत. (प्रतिनिधी)

सुरक्षेसाठी वृक्षारोपण बोगेर्वाडीतील त्या धोकादायक कड्याची दुरुस्ती केलेली आहे. तसेच कड्याच्या कपारी ढासळू नयेत, यासाठी त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर जुनी वसाहत अद्याप कड्याखालीच आहे. त्यातील काही घरे मोडून काढण्यात आली आहेत. कोयना भूकंप पुनर्वसनचा काही निधी बोगेर्वाडीच्या पुनर्वसनासाठी दिला आहे. तर नूतन तहसीलदार रामहरी भोसले व प्रांताधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून शासनाचा निधी नुकताच काही महिन्यांपूर्वी बोर्गेवाडी ग्रामस्थांना वितरीत केला आहे. बोगेर्वाडीचे जवळपास पुनर्वसन झाले आहे. तरीही जुन्या गावठाणात अद्याप काही घरे वास्तव्य करत आहेत. नवीन पुनर्वसन गावठाणासाठी अजूनही निधी देणे आवश्यक आहे.

- संजय जाधव, सरपंच, मेंढोशी