शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

पाटण तालुक्यातील माळीण दुर्लक्षित

By admin | Updated: April 4, 2017 18:00 IST

शासनाच्या भरीव निधीची गरज, कड्याखालच्या बोर्र्गेवाडीचे पुनर्वसन अर्धवटच!

 आॅनलाईन लोकमत

पाटण, दि. ४ : एखाद्या दगडी गुहेत राहतोय की काय? अशा अवस्थेत वास्तव्यास असलेल्या मेंढोशी ग्रामपंचायतीच्या अखत्यारित असलेल्या बोगेर्वाडीची धोकादायक कड्याखालून सुटका झालेली नाही. प्रत्येक दिवश मृत्यू उशाला घेऊन तेथील ग्रामस्थ जगत आहेत. बोगेर्वाडीच्या नवीन पुनर्वसित वसाहतीकडे शासनाचे म्हणावे तितके लक्ष नसल्यामुळे पुनर्वसन अर्धवटच आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव भुस्खलनात रात्री गायब झाले. त्यानंतर लोकमतने जिल्ह्यातील सातारा, पाटण, जावळी या दुर्गम तालुक्यांतील माळीण गावे शोधून काढली. तेथील लोकांचे प्रश्न प्रकषार्ने मांडले. त्यानंतर या गावांचे पुनर्वसन करण्याची आश्वासने दिली गेली. त्यानंतर माळीणचे पुनर्वसन झाले. तेथील शाळेची इमारत सोशल मीडियावर फिरत आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील माळीण गावाची काय अवस्था आहे, हे पाहिले असता पुनर्वसन झालेले नसल्याचेच समोर आले.

पुणे जिल्ह्यातील दुर्घटना झाली त्यावेळी पाटण तालुक्यातील बोगेर्वाडीची धास्ती सर्वांनाच लागून राहिली होती. तेथील ६१ कुटुंबे कड्याकपारीखाली राहत होती. कधी कडा कोसळेल आणि मोठी आपत्ती ओढावेल, हे शासनासह सर्वांनाच माहीत होते. माळीण दुर्घटनेपूवीर्ही बोगेर्वाडीचा प्रश्न गाजला होता. त्यासाठी माजी आमदार असो की विद्यमान दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले. आजच्या स्थितीत ६१ पैकी ४१ कुटुंबांचे त्याच गावच्या हद्दीत पुनर्वसन झाले. आता फक्त दोन घरे त्या जुन्या कड्याखालच्या वस्तीत राहत आहेत. कारण त्यांची आर्थिक स्थिती घर बांधण्यासारखी नाही. शासनाने बोगेर्वाडीकरांना भूखंड दिला आहे. मात्र, घरे बांधण्यासाठी भरीव मदत केलेली नाही. नवीन पुनर्वसन गावठाणात रस्ते, नळयोजना अद्याप रोडावलेल्या अवस्थेत आहेत. (प्रतिनिधी)

सुरक्षेसाठी वृक्षारोपण बोगेर्वाडीतील त्या धोकादायक कड्याची दुरुस्ती केलेली आहे. तसेच कड्याच्या कपारी ढासळू नयेत, यासाठी त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. तर जुनी वसाहत अद्याप कड्याखालीच आहे. त्यातील काही घरे मोडून काढण्यात आली आहेत. कोयना भूकंप पुनर्वसनचा काही निधी बोगेर्वाडीच्या पुनर्वसनासाठी दिला आहे. तर नूतन तहसीलदार रामहरी भोसले व प्रांताधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून शासनाचा निधी नुकताच काही महिन्यांपूर्वी बोर्गेवाडी ग्रामस्थांना वितरीत केला आहे. बोगेर्वाडीचे जवळपास पुनर्वसन झाले आहे. तरीही जुन्या गावठाणात अद्याप काही घरे वास्तव्य करत आहेत. नवीन पुनर्वसन गावठाणासाठी अजूनही निधी देणे आवश्यक आहे.

- संजय जाधव, सरपंच, मेंढोशी