शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

नाल्यांवरील अडीचशे मालमत्ता पाडणार

By admin | Updated: December 23, 2015 00:10 IST

औरंगाबाद : शहरातील नाल्यांमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या अडीचशेहून अधिक मालमत्ता भूमिगत गटार योजनेमुळे धोक्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : शहरातील नाल्यांमध्ये अतिक्रमण करून बांधलेल्या अडीचशेहून अधिक मालमत्ता भूमिगत गटार योजनेमुळे धोक्यात आल्या आहेत. भूमिगत गटारची लाईन टाकण्यास या मालमत्ता अडथळा ठरत आहेत. त्यामुळे संबंधित मालमत्ता पाडण्याचे आदेश मंगळवारी प्रभारी मनपा आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरातील नाल्यांच्या काठांवर तसेच नाल्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. अनेक ठिकाणी लोकांनी नाल्यांवर स्लॅब टाकूनही बांधकाम केले आहे. आतापर्यंत पालिकेकडून या मालमत्तांकडे दुर्लक्ष झाले; परंतु आता यातील काही मालमत्ता भूमिगत गटार योजनेच्या कामात अडथळा ठरत आहेत. शहरात मागील सव्वा वर्षापासून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. ४६७ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेंतर्गत शहरात प्रमुख आणि अंतर्गत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. संबंधित ठेकेदाराकडून विविध भागांत हे काम सुरू आहे; परंतु काही ठिकाणी नाल्यांमधून प्रमुख मलनिस्सारण वाहिन्या नेण्यास अतिक्रमणांचा अडथळा येत आहे. अतिक्रमित मालमत्ता पाडल्याशिवाय तेथे प्रमुख मलनिस्सारण वाहिनी टाकणे शक्यच नाही, अशा मालमत्तांची काही दिवसांपासून पालिका प्रशासनाने यादी केलेली आहे. मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या सर्वेक्षणाचा अहवाल तयार करून तो पुढील कारवाईसाठी नगररचना विभागाकडे सादर केलेला आहे. त्यावर आता नगररचना विभागाने मार्किंग करून नेमका अतिक्रमित भाग दर्शवायचा आहे. त्यानंतर ही संचिका पुढील कारवाईसाठी प्रशासकीय विभागाकडे जाईल. प्रभारी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बोलाविलेल्या स्थायी समिती सदस्यांच्या बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला. त्यावर केंद्रेकर यांनी अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे तात्काळ पाडा, असा आदेश प्रशासनाला दिला. त्यामुळे आता लवकरच अशी कारवाई होणार आहे.मालमत्ता पाडणे हाच पर्यायशहरात सव्वा वर्षापासून भूमिगत गटारचे काम सुरू आहे. आतापर्यंत पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त काम झाले आहे. ठेकेदाराला हे काम पूर्ण करण्यासाठी आता आणखी दीड वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. या काळात काम पूर्ण होण्यासाठी अडथळे दूर होणे गरजेचे आहे. ते दूर झाल्यावरच काम पूर्ण होऊ शकेल, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.