शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

वेळे ढेण कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा

By admin | Updated: June 20, 2017 17:41 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : कोयना प्रकल्पग्रस्त वेळे ढेण, ता. जावळी या गावातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पग्रस्तांचे रायगड जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हाही निर्णय आता रद्द झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करा. तसेच त्यांना शेतीयोग्य जमीन द्या. याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घ्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

वेळे ढेण येथील कोयना प्रकल्पग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्यवनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उप संचालक डॉ. विनिता व्यास, प्रकल्प अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (कोयना) तानाजी गायकवाड यांच्यासह कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, रामचंद्र कोकरे पाटील, जगन्नाथ कोकरे, पांडूरंग कोकरे, लक्ष्मण कोकरे, गोविदं कोकरे, विलास कोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

या बैठकीत रामचंद्र कोकरे आणि प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडून या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करण्यात येईल. त्यांना शेतीयोग्य जमीन देण्यात येईल, असे बेन यांनी यावेळी सांगितले. मात्र जमीन खडकाळ आणि मुरमाड असल्याने ती शेती योग्य नाही. आम्हाला शेतीयोग्य जमीन द्या, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शेतीयोग्य जमिनीतीच करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तशी जमीन उपलब्ध नसल्यानस वनविभागाच्या उपलब्ध जमिनी देता येतील का, याचाही विचार करावा. तसेच येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. प्रशासकीय अडथळे येत असतील तर, वेळे ढेण येथील २६ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवा. आपण योग्य तो पाठपुरावा करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यात शेतीयोग्य जमिनी मिळतील यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन डॉ. बेन यांनी यावेळी दिले. बैठकीत झालेल्या सकारात्मक चचेर्मुळे पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न येत्या महिनाभरात सुटेल अशी आशा वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केली आणि आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.