शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

वेळे ढेण कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन तातडीने करा

By admin | Updated: June 20, 2017 17:41 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २0 : कोयना प्रकल्पग्रस्त वेळे ढेण, ता. जावळी या गावातील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल्पग्रस्तांचे रायगड जिल्ह्यात पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, हाही निर्णय आता रद्द झाला असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करा. तसेच त्यांना शेतीयोग्य जमीन द्या. याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घ्या, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

वेळे ढेण येथील कोयना प्रकल्पग्रस्त आणि अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला मुख्यवनसंरक्षक तथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन, उप संचालक डॉ. विनिता व्यास, प्रकल्प अधिकारी तथा सहायक वनसंरक्षक (कोयना) तानाजी गायकवाड यांच्यासह कोयना प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, रामचंद्र कोकरे पाटील, जगन्नाथ कोकरे, पांडूरंग कोकरे, लक्ष्मण कोकरे, गोविदं कोकरे, विलास कोकरे यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

या बैठकीत रामचंद्र कोकरे आणि प्रकल्पग्रस्तांनी आपल्या समस्या मांडून या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन सातारा जिल्ह्यातच करण्यात येईल. त्यांना शेतीयोग्य जमीन देण्यात येईल, असे बेन यांनी यावेळी सांगितले. मात्र जमीन खडकाळ आणि मुरमाड असल्याने ती शेती योग्य नाही. आम्हाला शेतीयोग्य जमीन द्या, अशी आग्रही मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली. यावर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शेतीयोग्य जमिनीतीच करावे, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तशी जमीन उपलब्ध नसल्यानस वनविभागाच्या उपलब्ध जमिनी देता येतील का, याचाही विचार करावा. तसेच येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. प्रशासकीय अडथळे येत असतील तर, वेळे ढेण येथील २६ प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करुन शासनाकडे पाठवा. आपण योग्य तो पाठपुरावा करु, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

येत्या महिनाभरात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. तसेच प्रकल्पग्रस्तांना सातारा जिल्ह्यात शेतीयोग्य जमिनी मिळतील यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन डॉ. बेन यांनी यावेळी दिले. बैठकीत झालेल्या सकारात्मक चचेर्मुळे पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न येत्या महिनाभरात सुटेल अशी आशा वेळे ढेण येथील प्रकल्पग्रस्तांनी यावेळी व्यक्त केली आणि आ. शिवेंद्रसिंहराजे व उपस्थित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.