शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आनेवाडी, तासवडे टोलनाका सातारकरांना मोफत करा, शिवसेना आक्रमक

By नितीन काळेल | Updated: January 13, 2024 18:09 IST

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला.

सातारा : सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर कमी अंतरासाठीही सातारकरांना टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकरांची अक्षरक्षा लूट आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात स्थानिकांना टोलमाफी आहे, तसेच साताऱ्यातील टोलनाक्यावरही जिल्हावासीयांना माफी मिळावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे. तसेच १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर लुटमार थांबविण्यासाठी ठिय्या मांडण्याचा इशाराही दिला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, जिल्हा संघटिका सुनंदा महामुलकर, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, प्रशांत पवार, शहरप्रमुख शिवराज टोणपे, उपजिल्हा समन्वयक प्रशांत शेळके, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे यांच्यासह इम्रान बागवान, रवींद्र भणगे, हरिदास पवार, किशोर घोरपडे, आकाश पवार, सुरेश कांबळे, नीलेश चव्हाण, सागर कदम आदी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी आणि तासवडे येथे दोन टोलनाके आहेत. सातारच्या नागरिकांना जिल्हांतर्गत कोठे जायचे झाल्यास तसेच कमी अंतरासाठी जायचे म्हटले तर अन्यायकारक अशी टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकर नागरिकांची एकप्रकारे लूट आहे. या कारणाने स्थानिक नागरिक आणि टोल प्रशासनामध्ये वारंवार वाद होतात. वास्तविक एका बाजुला रस्त्याचा कर भरून घेतला जात असताना मागील २० वर्षांपासून अन्यायकारकपणे टोल घेतला जात आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफीतून वगळावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून काहीही सकारात्मक आलेले नाही. त्यामुळे दि. १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडणार आहे. आता सातारकरांना टोलमधून वगळल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.

टोलमाफीशिवाय लढा थांबणार नाही...

महामार्गावर खड्डे पडलेले असतात. ते कधी मुजवले जात नाहीत. महामार्गावरील अधिक अपघात हे वेगाने वाहन जाण्याने होत नाहीत तर खड्ड्यामुळे होतात. त्यातच देशात अघोषित युद्ध सुरू आहे. सरकार आणि उद्योगपतींची युती आहे. त्यामुळेच नागरिकांना टोल भरावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील या टोलमुक्तीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे. हा जिल्ह्याचा लढा आहे. तसेच सातारकरांना टोलमाफी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाShiv Senaशिवसेना