शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
4
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
5
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
6
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
7
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
8
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
9
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
10
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
11
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
12
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
13
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
14
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
15
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
16
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
17
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
18
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
19
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
20
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!

आनेवाडी, तासवडे टोलनाका सातारकरांना मोफत करा, शिवसेना आक्रमक

By नितीन काळेल | Updated: January 13, 2024 18:09 IST

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला.

सातारा : सातारा जिल्ह्यातील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर कमी अंतरासाठीही सातारकरांना टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकरांची अक्षरक्षा लूट आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात स्थानिकांना टोलमाफी आहे, तसेच साताऱ्यातील टोलनाक्यावरही जिल्हावासीयांना माफी मिळावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे. तसेच १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर लुटमार थांबविण्यासाठी ठिय्या मांडण्याचा इशाराही दिला आहे.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख मोहिते यांनी हा इशारा दिला. यावेळी जिल्हा समन्वयक रामदास कांबळे, जिल्हा संघटिका सुनंदा महामुलकर, सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, प्रशांत पवार, शहरप्रमुख शिवराज टोणपे, उपजिल्हा समन्वयक प्रशांत शेळके, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे यांच्यासह इम्रान बागवान, रवींद्र भणगे, हरिदास पवार, किशोर घोरपडे, आकाश पवार, सुरेश कांबळे, नीलेश चव्हाण, सागर कदम आदी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख सचिन मोहिते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यातून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या मार्गावर सातारा जिल्ह्यात आनेवाडी आणि तासवडे येथे दोन टोलनाके आहेत. सातारच्या नागरिकांना जिल्हांतर्गत कोठे जायचे झाल्यास तसेच कमी अंतरासाठी जायचे म्हटले तर अन्यायकारक अशी टोलची रक्कम भरावी लागते. ही सातारकर नागरिकांची एकप्रकारे लूट आहे. या कारणाने स्थानिक नागरिक आणि टोल प्रशासनामध्ये वारंवार वाद होतात. वास्तविक एका बाजुला रस्त्याचा कर भरून घेतला जात असताना मागील २० वर्षांपासून अन्यायकारकपणे टोल घेतला जात आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफीतून वगळावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. त्यांच्याकडून काहीही सकारात्मक आलेले नाही. त्यामुळे दि. १५ जानेवारीला आनेवाडी टोलनाक्यावर ठिय्या मांडणार आहे. आता सातारकरांना टोलमधून वगळल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही.

टोलमाफीशिवाय लढा थांबणार नाही...

महामार्गावर खड्डे पडलेले असतात. ते कधी मुजवले जात नाहीत. महामार्गावरील अधिक अपघात हे वेगाने वाहन जाण्याने होत नाहीत तर खड्ड्यामुळे होतात. त्यातच देशात अघोषित युद्ध सुरू आहे. सरकार आणि उद्योगपतींची युती आहे. त्यामुळेच नागरिकांना टोल भरावा लागतोय. सातारा जिल्ह्यातील या टोलमुक्तीच्या आंदोलनात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे. हा जिल्ह्याचा लढा आहे. तसेच सातारकरांना टोलमाफी मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. शेवटच्या टप्प्यापर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाShiv Senaशिवसेना