शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

महाविकास आघाडी सरकार कुबडीशिवाय चालत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच ...

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच हे सरकार कुबडीशिवाय चालत नाही. त्यामुळे स्वबळाचा नारा करणं हास्यास्पद आहे,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

सातारा येथे आल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी आमदार शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘कोरोनानं अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यापाऱ्यांचा रोष वाढत चाललाय. हातावर पोट असणाऱ्यांनी कोठे जायचे, हा प्रश्न आहे. गरिबांसाठी मदतीची योजना नाही. तर रोजगार निर्माण करणाऱ्यांसाठीही काही केले नाही. याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे. शासनाने आता घाबरटपणा सोडायला हवा.’

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आमदार शेलार म्हणाले, अध्यक्षपद निवड हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, त्यांनी निवडणुकीची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांच्या खांद्यावर तिन्हीही पक्षांनी बंदूक ठेवली होती. चूक नसताना भाजपच्या आमदारांना निलंबनाला सामोरं जावं लागलं आहे.

केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळालं नाही. ते नाराज आहेत का? पत्रकारांच्या या प्रश्नावर आमदार शेलार म्हणाले, ‘उदयनराजे हे राजे आहेत. पक्षावर कोणीही नाराज नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पक्षातील स्थान मोठे व मानाचं आहे. ते कायम राहील. मुंडे कुटुंबातीलही कोणीही पक्षावर नाराज नाही.’

मराठा समाज आरक्षणावर आमदार शेलार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं. पण, सरकार बदललं की आरक्षणही गेलं. आघाडी शासनाला ते टिकवता आलं नाही. याचे पाप या सरकारकडेच आहे.’

चौकट :

ईडीनं काम करावं का नको...

जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ईडीने (सक्तवसुली संचालनालय) माहिती मागितल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आमदार आशिष शेलार यांनी चौकशी यंत्रणेनं काम करायचं का नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कर नाही तर डर कशाला पाहिजे, असे उत्तर दिले. तर सातारा नगरपालिका निवडणूक भाजप लढविणार का? पत्रकारांच्या या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

.........................................................