शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

महाविकास आघाडी सरकार कुबडीशिवाय चालत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:24 IST

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच ...

सातारा : ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोरोना नियंत्रणाबाबत अपयशी ठरलेलं आहे. त्यातीलच कोणीतरी स्वबळावर लढणार, असं सांगत आहेत. मुळातच हे सरकार कुबडीशिवाय चालत नाही. त्यामुळे स्वबळाचा नारा करणं हास्यास्पद आहे,’ अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

सातारा येथे आल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची निवासस्थानी आमदार शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी टीका केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘कोरोनानं अनेकांचा रोजगार गेला आहे. व्यापाऱ्यांचा रोष वाढत चाललाय. हातावर पोट असणाऱ्यांनी कोठे जायचे, हा प्रश्न आहे. गरिबांसाठी मदतीची योजना नाही. तर रोजगार निर्माण करणाऱ्यांसाठीही काही केले नाही. याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार आहे. शासनाने आता घाबरटपणा सोडायला हवा.’

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आमदार शेलार म्हणाले, अध्यक्षपद निवड हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, त्यांनी निवडणुकीची हिंमत दाखवावी. भास्कर जाधव यांच्या खांद्यावर तिन्हीही पक्षांनी बंदूक ठेवली होती. चूक नसताना भाजपच्या आमदारांना निलंबनाला सामोरं जावं लागलं आहे.

केंद्र शासनाच्या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार उदयनराजे भोसले यांना स्थान मिळालं नाही. ते नाराज आहेत का? पत्रकारांच्या या प्रश्नावर आमदार शेलार म्हणाले, ‘उदयनराजे हे राजे आहेत. पक्षावर कोणीही नाराज नाही. गोपीनाथ मुंडे यांचे पक्षातील स्थान मोठे व मानाचं आहे. ते कायम राहील. मुंडे कुटुंबातीलही कोणीही पक्षावर नाराज नाही.’

मराठा समाज आरक्षणावर आमदार शेलार म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकलं. पण, सरकार बदललं की आरक्षणही गेलं. आघाडी शासनाला ते टिकवता आलं नाही. याचे पाप या सरकारकडेच आहे.’

चौकट :

ईडीनं काम करावं का नको...

जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ईडीने (सक्तवसुली संचालनालय) माहिती मागितल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. यावर आमदार आशिष शेलार यांनी चौकशी यंत्रणेनं काम करायचं का नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणू नये. कर नाही तर डर कशाला पाहिजे, असे उत्तर दिले. तर सातारा नगरपालिका निवडणूक भाजप लढविणार का? पत्रकारांच्या या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.

.........................................................