शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा १५ दिवसांत फेरआढावा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:40 IST

कोरेगाव : ‘राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे येत्या १५ दिवसांत पुनरावलोकन केले जाईल. तसेच ही योजना राबविणाऱ्या ...

कोरेगाव : ‘राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे येत्या १५ दिवसांत पुनरावलोकन केले जाईल. तसेच ही योजना राबविणाऱ्या खासगी रुग्णालयांचे प्रश्न तातडीने सोडविले जातील,’ अशी ग्वाही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशनचे राज्याध्यक्ष डॉ. जे. टी. पोळ, उपाध्यक्ष डॉ. चिन्मय एरम, कार्यकारिणी सदस्य डॉ. बळीराम बागल, डॉ. बापूसाहेब खांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ. राजेंद्र गोसावी यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुंबई येथे मंत्री टोपे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत टोपे यांनी वरील ग्वाही दिली. यावेळी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. सचिन जाधव व संजीव खानोरकर उपस्थित होते.

महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत अल्प पॅकेजमध्ये खासगी डॉक्टरांनी सहा लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. लोकाभिमुख आणि लोकोपयोगी अशी ही योजना २०११च्या कमी पॅकेजमुळे डॉक्टर राबविण्यास अनुत्सुक असून, पॅकेजची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर टोपे यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शासन, विमा कंपनी आणि हॉस्पिटल वेल्फेअर असोसिएशन यांची एक समिती स्थापन करून निर्णय घेतला जाईल, असेही स्पष्ट केले.

जिल्हास्तरावर डॉक्टर, रुग्ण आणि महात्मा फुले योजना यांच्यामध्ये चांगला समन्वय होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यासही टोपे यांनी मान्यता दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेत कार्यरत खासगी रुग्णालयांची मागील वर्षापासून प्रलंबित असलेली कोट्यवधी रुपयांची बिले ही ताबडतोब देण्याचे निर्देश डॉ. सुधाकर शिंदे यांनी विमा कंपनीला दिले.

शासनाने महात्मा फुले योजनेतून एक एप्रिल २०२१ पासून १२० (आजार) पॅकेजस खासगी रुग्णालयांच्या यादीतून वगळली आहेत. त्यामुळे सामान्य व गरीब रुग्णांना सध्या शस्त्रक्रिया करण्यासाठी विनाकारण खूप खर्च करावा लागत आहे. तेव्हा ही सर्व पॅकेजस खासगी रुग्णालयांना परत द्यावीत. रुग्णांना दिला जाणारा आहार व प्रवास भाडे योजनेतून द्यावे. रुग्णांची तक्रार रुग्णाला डिस्चार्ज दिल्यापासून दहा दिवसांच्या आत करण्यात आल्यास ग्राह्य धरावी. कोरोना काळात रुग्ण संख्या व अपुरे मनुष्यबळ लक्षात घेऊन रुग्णालयांनी विलंबाने सादर केलेली बिले ग्राह्य धरावीत. योजनेतील सेवा व बिले ही करमुक्त असावीत. अनेक लोकांनी या योजनेकडे रुग्णालयाची तक्रार करून पैसे उकळण्याचे मध्यम बनवले आहे. अशा खोट्या तक्रारी करणाऱ्या व विनाकारण रुग्णालयांची बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, आदी मागण्याही करण्यात आल्या. त्यावरही चर्चा करण्यात आली.

२६कोरगाव

फोटो ओळ : राजेश टोपे यांना निवेदन देताना डॉ. जे. टी. पोळ, शेजारी डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. चिन्मय एरम, डॉ. राजेंद्र गोसावी, डॉ. बळीराम बागल, डॉ. बापूसाहेब खांडेकर, डॉ. संजय कदम, डॉ. हिमांशू गुप्ता, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य.