शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद

By admin | Updated: April 24, 2016 23:25 IST

नीलेश राणे : राज्यव्यापी दौऱ्याचा रत्नागिरीत आरंभ

रत्नागिरी : गुजरातमधील १५ टक्के पटेल समाजाने आपल्या मागण्यांसाठी गुजरात पेटविले. महाराष्ट्रात ३२ टक्के मराठा समाज आहे. मग मराठा समाजासाठी शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळविण्यात तुम्ही मागे का? पेटून उठा. आपण एकजुटीने हा लढा लढायला हवा. फडणवीस सरकारने कायद्याच्या आडून दाबून ठेवलेला मराठा आरक्षणाचा आपला हक्क मिळालाच पाहिजे. आता लढाई आर या पार असेल. होईल ते होऊदे. आरक्षण मिळविण्यासाठी प्रसंगी मुंबई, महाराष्ट्र बंद करू, असा इशारा माजीखासदार नीलेश राणे यांनी रविवारी दिला. तसेच येत्या ११ जुलैला मुंबईत होणाऱ्या मोर्चासाठी सज्ज होण्याचे आवाहनही केले. येथील मराठा मैदानात मराठा समाज बांधवांचा मेळावा रविवारी सायंकाळी आयोजित केला होता. या सभेला जिल्ह्यातील मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर केशवराव भोसले, विजय भोसले, माजी आमदार विजय तथा आप्पा साळवी, राजन देसाई, मधुकर दळवी, केशवराव इंदुलकर, सुधाकर सावंत, जिजाऊ संघटनेचे कोकण संघटक सुधीर भोसले व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले, जे मराठा आरक्षण मागणीच्या आड येतील, त्यांना समाज सोडणार नाही. या आरक्षणासाठीचा राज्यव्यापी दौरा रत्नागिरीतून सुरू केला आहे. ज्यांना बरोबर यायचे आहे, त्यांचे स्वागत आहे. आम्ही नोकरी व शिक्षणात आरक्षण मागत आहोत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी १६ टक्के आरक्षणाचा अभ्यासपूर्ण अहवाल सरकारला सादर केला आहे. मात्र, आताच्या फडणवीस सरकारने तो दाबून ठेवण्याचा डाव रचला आहे. हा डाव उधळून लावण्यासाठी राज्यातील मराठा समाजाने एकत्र यावे. आपला यात कोणताही पक्षीय हेतू नाही, असेही ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरात फिरताना मराठा समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी दिसली. त्यातूनच राणे यांनी राज्यातील ३२ टक्के मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाबाबतचा अहवाल शासनाला सादर केला. मात्र, कायद्याच्या जंजाळात हा अहवाल अडकून पडला असून, मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. ते मिळविण्यासाठीच ही मोठी लढाई राज्यभरातील समाज बांधवांना एकत्रित येऊन लढावयाची आहे. राज्याच्या प्रत्येक भागात मराठा समाजाच्या सभा आपण घेणार आहे. या लढ्यात मुख्यमंत्री विघ्न आणण्याचा प्रयत्न करतील, परंतु मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला हलके समजू नये. मराठा समाज मैदान सोडणार नाही. आजवर एकजूट नव्हती म्हणून यांना माज आलाय. त्यामुळे या राज्यव्यापी दौऱ्यानंतर ११ जुलैला पाच लाखांचा मोर्चा मुंबईत धडकेल, असेही ते म्हणाले. यावेळी समाजाचे नेते केशवराव भोसले म्हणाले, राजकारणात खोटारडेपणा वाढला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई नीलेश राणे हे एकट्याने लढू शकत नाहीत. त्यांना सर्व मराठा बांधवांनी ताकद द्यावी, साथ द्यावी व मराठा समाजातील गोरगरिबांसाठी ही लढाई लढून जिंकावी. मराठा आरक्षण होण्याची शक्यता धूसर होती, परंतु माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे ती दृष्टिक्षेपात आली आहे, असे सुधीर भोसले म्हणाले. शिक्षण व नोकरीत आरक्षण नसल्याने मराठा समाजाची पीछेहाट झाल्याचे मधुकर दळवी म्हणाले. देणग्या घेत शिक्षणाचा बाजार करणाऱ्यांना धडा शिकवा, असे आप्पा साळवी म्हणाले. राजन देसाई व सुधाकर सावंत यांनीही आपले विचार मांडले. (प्रतिनिधी)दुसऱ्याचे न ऐकणारा मुख्यमंत्रीदर दिवशी मराठा समाज बांधवांची तडफड सुरू आहे. ही तडफड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला दिसत नाही. हे मुख्यमंत्री तिरसट आहेत. दुसऱ्याचे न ऐकणारा मुख्यमंत्री आम्ही याआधी पाहिलेला नाही. मराठा आरक्षणासाठी यांना कशासाठी पाया पडायचे. स्वाभिमानी मराठा समाजाचा तो बाणा नाही. मराठा समाज पाया पडत नाही तर हक्क मिळविण्यासाठी पाय तोडतो, हे लक्षात ठेवावे. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. त्यामुळे आता हा राज्यव्यापी लढा कोणीही थांबवू शकणार नाही. आरक्षण हे मिळविणारच, असे नीलेश राणे यांनी यावेळी निक्षून सांगितले.