शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी एक्स्प्रेस थांब्यासाठी कोरेगावला हिरवा कंदील

By admin | Updated: March 19, 2015 00:00 IST

मध्य रेल्वे सकारात्मक : गाडी थांबणार असल्याचे प्रवाशांत आनंद

कोरेगाव : दुष्काळी खटाव व माण तालुक्यांसह कोरेगाव तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची मध्य रेल्वेची कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबण्याचा मार्ग जवळपास मोकळा होत आला आहे. तत्कालीन गृहमंत्री व दिवंगत आर. आर. पाटील यांनी घेतलेल्या परिश्रमाला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांची संख्या आणि रेल्वे गाड्यांची संख्या याबाबतचा अहवाल नुकताच मध्य रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. कोरेगाव ही केवळ सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर दुष्काळी खटाव आणि माण तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या कोरेगाव येथे रेल्वेस्थानक असल्याने तिन्ही तालुक्यांतील प्रवासी कोरेगाव रेल्वे स्थानकाचा सर्वाधिक वापर करतात. केवळ एकेरी मार्ग असल्याने सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांचा ओघ प्रचंड आहे. पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी प्रवासी उत्सुक नसतात. महाराष्ट्र, सह्याद्री आणि कोयना एक्स्प्रेस कोरेगाव स्थानकावर थांबतात आणि त्या जिल्ह्यातून प्रवास करत असताना पॅसेंजरच्या धर्तीवर चालत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे वेगवान कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वेस्थानकावर थांबवावी, अशी बऱ्याच दिवसांपासूनची मागणी होती. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. आदर्श ग्रामपंचायत धामणेरने त्याबाबत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. पुणे येथील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला होता. मध्य रेल्वे व्यवस्थापनाने याबाबत सकारात्मकता दाखवली असून, त्यांनी कोरेगाव रेल्वे स्थानकाच्या संबंधितांशी गेल्या सहा महिन्यांतील मुंबईकडे धावणाऱ्या गाड्यांची संख्या, प्रवाशांची संख्या आणि प्रवासी उत्पन्न याची माहिती मागवली होती. याबाबत सकारात्मक अहवाल पुणे येथे पोहोचला आहे. मध्य रेल्वेला आवश्यक असलेले प्रवासी उत्पन्न मिळत असल्याने आता कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस कोरेगाव रेल्वे स्थानकावर थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी)जनतेमध्ये आनंदाचे वातावरणकोरेगाव येथून रात्री ११.५५ च्या सुमारास मुंबईला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेसला थांबा मिळणार असल्याने प्रवाशांची व विशेषत: करून व्यापाऱ्यांची चांगली सोय होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी तातडीने महाराष्ट्र दिनापूर्वी हा थांबा कार्यान्वित केल्यास चांगली सोय होणार आहे. सध्या जनतेमध्ये याबाबत आनंदाचे वातावरण आहे.