शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

महादरेचा रस्ता पन्नास वर्षांनंतर प्रकाशमान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महादरेवासीयांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले आहे. केसकर कॉलनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गेल्या पन्नास वर्षांपासून पथदिव्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या महादरेवासीयांचे स्वप्न अखेर पूर्णत्वास आले आहे. केसकर कॉलनी ते महादरे या रस्त्याचे रुंदीकरण होणार असून, दोन किलोमीटरच्या रस्त्यावर पथदिवे उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल पन्नास वर्षांनंतर हा रस्ता प्रकाशमान होणार असल्याने ग्रामस्थांचे चेहरेही आनंदाने फुलले आहेत.

सातारा शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न तब्बल चाळीस वर्षांपासून प्रलंबित होता. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करूनही नगरविकास विभागाने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला नव्हता. त्यामुळे सातारा शहर, उपनगर व त्रिशंकू भागाच्या विकासावर दूरगामी परिणाम झाले होते. अखेर ८ सप्टेंबर २०२० रोजी शासनाने हद्दवाढीच्या अंतिम प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाला आता वर्षपूर्ती होत आहे. दरे खुर्द ते यवतेश्वर पायथा, शाहुपुुरी, विलासपूर, करंजे, गोडोली खेड येथील काही भाग पालिकेच्या हद्दीत आला आहे. हद्दवाढ होताच पालिका प्रशासनाने वाढीव भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला आहे.

यवतेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या महादरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. पूर्वी हा रस्ता तीन मीटर होता, आता तो नऊ मीटर रुंद होणार आहे. केसकर कॉलनी ते महादरे या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर आजवर कधीच पथदिवे लागले नाहीत. मात्र, आता हा रस्ता प्रकाशमान होणार आहे. नगरसेवक वसंत लेवे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार या रस्त्यावर तीस पथदिवे उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तब्बल पन्नास वर्षांनंतर हा रस्ता दिव्यांनी उजळून निघणार आहे. या गावचा विकास साधण्यासाठी नगरोत्थान योजनेतून २५ लाखांची तरतूदही केली जाणार आहे.

(कोट)

महादरेकडे जाणाऱ्या रस्त्याचे आजवर कधीच रुंदीकरण झाले नाही. हद्दवाढीमुळे रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच रुंदीकरणाचे काम सुरू होईल. दोन किलोमीटरच्या रस्त्यावर पथदिवे देखील बसविण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दशकांचा अंधारही आता दूर होईल.

- वसंत लेवे, नगरसेवक

(कोट)

दरे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दवाढीमुळे बरखास्त झाली. ग्रामपंचायती अंतर्गत येणारा महादरे परिसर पालिकेशी जोडला गेल्याने या भागाच्या विकासाला आता गती मिळाली आहे. पथदिवे, रस्ता ही मूलभूत कामे मार्गी लागणार असल्याचे समाधान आहे.

- रवी पाटेकर, माजी सरपंच, दरे बुुद्रुक

(चौकट)

ग्रामस्थांच्या या आहेत अपेक्षा

- जीवन प्राधिकरण ऐवजी कासचं पाणी मिळावं

- अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे

- अंगणवाडीसाठी दोन स्वतंत्र इमारतींची गरज

- जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे

- मुलांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा

- खुल्या जागी व्यापारी संकुल उभारल्यास रोजगाराला चालना

- नगरपालिकेचे एक विभागीय कार्यालय सुरू व्हावं

लोगो : हद्दवाढीची वर्षपूर्ती : भाग १