शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरनं पांघरला ‘प्लास्टिक शालू’

By admin | Updated: June 15, 2014 00:14 IST

सर्वाधिक पाऊस : तीन-तीन मजली इमारतींनाही भलं मोठं आच्छादन

महाबळेश्वर : महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरवासीयांना मान्सूनची चाहूल लागली आहे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी घराबरोबरच मोठमोठी हॉटेल्सही प्लास्टिकच्या आच्छादनात बंदिस्त होऊ पाहत आहे.महाबळेश्वरचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी चार ते पाच हजार मिलीमीटर इतके आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा अन् थंडीचा विलक्षण खेळ इथे पाहावयास मिळतो. यासर्व बाबींचा स्थानिक नागरिक तसेच उद्योग, व्यवसायांवर परिणाम होतो. घरात, दुकानात तसेच हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ होताना दिसते. पावसाचे पाणी हे घर व इमारतींच्या स्लॅब मधून झिरपून घरात येते. त्यामुळे घराच्या भिंती पडण्याबरोबरच जमीन खचण्यासारख्या घटना इथे नेहमीच होत असतात. अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी नागरिक व व्यापारी पावसाळा सुरू होण्याअगोदर खबरादारीचे सर्व उपाय करतात.सध्या घरांना प्लास्टिक कागद अथवा झड्यांनी बंदिस्त करण्यासाठी नागरिकांची लगबग इथे सुरू झाली आहे. व्यापारी व हॉटेल व्यावसायिक देखील या कामात गुंतले आहेत. पावसात इलेक्ट्रिक वस्तूंबरोबरच अन्य वस्तूंचे मोठे नुकसान होत असल्याने या वस्तूंच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली जात आहे. मोठमोठ्या हॉटेल्स्ना गवताच्या झड्या लावणे शक्य नसल्याने अशी हॉटेल्स प्लास्टिक कागद अथवा पत्र्यांच्या आच्छादनाने बंदिस्त होऊ लागली आहेत. पावसाची मजा लुटण्यासाठी भेट देणाऱ्या पर्यटकांची मात्र यामुळे नेहमीच फसगत होताना दिसते. (प्रतिनिधी)