शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

महाबळेश्वरला पोहण्याची अ‍ॅलर्जी : धक्कादायक चित्र--लोकमत विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:44 IST

महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात.

ठळक मुद्दे८० टक्के मुला-मुलींना पाण्याची भीती; पोहण्यासाठी कसलीच सुविधा नसल्याने समस्या

सचिन काकडे ।महाबळेश्वर : ‘टाक मुटका... मार सुळका...’ असे शब्द पोहणाऱ्यांच्या तोंडी नेहमीच ऐकू येतात. प्रामुख्याने ग्रामीण भागात हे शब्द आजही प्रचलित आहेत. मात्र, महाबळेश्वर याला अपवाद ठरू पाहत आहे. कारण, शहरातील तब्बल ८० टक्के मुला-मुलींना पोहताच येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, यामध्ये १० ते २० वयोगटांतील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना शरीराचे सर्व स्नायू काम करतात. मन आनंदी राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते, शरीरालाथंडावा मिळतो, स्नायू बळकटहोतात. पोहता येणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते. मात्र, सर्वच बाबतीच प्रगत असलेल्या महाबळेश्वरातील अनेक शाळकरी मुला-मुलींना पोहताच येत नाही.महाबळेश्वरची भौगौलिक परिस्थिती या सर्व बाबींना काही प्रमाणात कारणीभूत असावी, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. चार ते पाच महिने पडणाºया पावसामुळे घरातून बाहेर पडणे मुश्कील असते. अशावेळी पोहण्याचा प्रश्नच येत नाही. यानंतर तीन महिने कडाक्याची थंडी. उन्हाळ्यात येथील शाळांना सुटी नसते. त्यामुळे मुलांना पोहण्यासाठी फारसा वेळ देता येत नाही. त्यातच शहरात पूर्वीपासूनच पोहण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकांना इच्छा असूनही पोहता येत नाही.दुसरीकडे ज्या मुलांना पोहता येते त्यांनी आपल्या पै-पाहुण्यांच्या गावी अथवा जिथे व्यवस्था आहे, अशा ठिकाणी पोहण्याचे धडे गिरविले आहे. पाचगणीतील काही शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांना पोहणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोहता येत नसल्याने शहरातील काही युवक व नागरिकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना आजपर्यंत अनेकदा घडल्या आहेत. असे असताना पालक व मुले पोहण्यापासून आजही चार हात लांब आहेत. ही बाब अत्यंतगंभीर असून, प्रशासनाने मुलांसाठी जलतरण तलाव खुला करणे गरजेचे बनले आहे.एकमेव तलाव १३ वर्षांपासून धूळखातमहाबळेश्वर पालिकेच्या वतीने शहरात जलतरण तलावाची उभारणी करण्यात आली. १२ जून २००४ रोजी या तलावाचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. काही काळ उपयोगात आल्यानंतर हा तलाव बंद पडला. गेल्या १३ वर्षांपासून वापराविना असलेल्या या तलावाला आता झुडपांनी वेढले आहे. पालिकेच्या वतीने डागडुजी केल्यास तो पुन्हा उपयोगात येऊ शकतो, असे मत नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.पोहण्याची खूप इच्छा होती; परंतु पोहायचे कोठे हेच समजत नव्हते. शहरातील अनेक हॉटेलमध्ये जलतरण तलाव आहेत. मात्र, या ठिकाणी पोहायला शिकणे अशक्य होते. त्यामुळे महाबळेश्वरजवळ असलेल्या लिंगमळा धबधब्याच्या डोहात पोहायला शिकलो. मात्र, शेकडो मुलांना आजही पोहता येत नाही.- राहुल आरडे, युवक