शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

‘मेड इन इंडिया’ ने होणार गौरी गणपतीची सजावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 13:28 IST

सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील चायना माल विक्रीस ठेवला नसल्याने यंदाची गौरी गणपतीची सजावट ही ‘मेड इन इंडिया’ च्या वस्तूने होणार असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

ठळक मुद्देयेत्या दोन आठवड्यामध्ये गौरी गणपतीचे आगमन बाजार पेठेत सजावटीची दुकाने सजू लागलीनागरीकांनी बंद केल्या चिनच्या वस्तू

सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील चायना माल विक्रीस ठेवला नसल्याने यंदाची गौरी गणपतीची सजावट ही ‘मेड इन इंडिया’ च्या वस्तूने होणार असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.

येत्या दोन आठवड्यामध्ये गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या बाजार पेठेत सजावटीची दुकाने सजू लागली आहेत. चायना वस्तू दिसायला आकर्षक व स्वस्त असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या वस्तूंना ग्राहकांची मागणी होते. त्यामुळे गणपती असो किंवा दिवाळी या वस्तूला मागणी वाढतच होती.

परंतु यंदा भारत आणि चिन मध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे नागरीकांनी स्वत:च चिनच्या वस्तू वापरण्यास बंद केल्या आहेत. याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सवात जाणवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणजे यंदाच्या गणेश उत्सवाला काही दुकानदारांनी चायना माल विक्रीस ठेवलेला नाही.