शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

शहापूर योजनेतून कमी दाबाने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:23 IST

सातारा : पावसामुळे उरमोडी जलाशयातून शहापूर योजनेत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्र ५० टक्के ...

सातारा : पावसामुळे उरमोडी जलाशयातून शहापूर योजनेत मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे पाणी उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू असून, पालिकेने उपसा केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन दिवसांपासून कास व उरमोडी परिसरात अतिवृष्टी सुरू आहे. मातीमुळे उरमोडी धरणाचे पाणी गढूळ झाले आहे. त्यामुळे उरमोडीतून शहापूर योजनेत गढूळ व गाळ मिश्रित पाणी येत आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उपसा केंद्र ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवले असून, गाळ काढण्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या कामामुळे शहापूूर योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजीत बापट व पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले आहे.