शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

कलानगरला कमी दाबाने पाणी

By admin | Updated: December 14, 2015 22:19 IST

कलानगरला कमी दाबाने पाणी

इंदिरानगर : कलानगरमध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला आहे. पाणीपुरवठा विभाग आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.कलानगरमध्ये अपार्टमेंट व सोसायटी दिवसागणिक वाढत आहेत. त्याचबरोबर नवनवीन समस्या उद्भवत आहे. यामध्ये अत्यंत कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा गंभीर समस्या बनली आहे. परिसरामध्ये सुमारे तीन वर्षांपासून ओंकार अपार्टमेंट, ओमेघा अपार्टमेंटसह परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. करंगळी इतकी बारीक धार नळास असल्याने पिण्याचे पाणीसुद्धा भरले जात नाही, तर वापरण्यासाठी आणायचे कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पाणी येते तेव्हा महिलावर्गाची तारेवरची कसरत होते. पाणी भरले जात नाही म्हणून गेल्या चार महिन्यांपासून एक दिवसाआड स्वखर्चाने पाण्याचा टँकर मागविला जात आहे. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून पाणीपुरवठा अधिकारी आणि लोकप्रतिनिधीकडे तक्रार करून दखल घेतली जात नाही. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. जोपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत पाणीपट्टी न भरण्याचा इशारा संतप्त आशा शेट्टी, संध्या जावीर, राधिका बेलगावकर, विमला नाईक, शोभना कुलकर्णींसह महिलावर्गांनी दिला आहे. (वार्ताहर)