शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रियकराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:48 IST

पाटण/कोयनानगर : ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेम प्रकरणातून युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. पाटण तालुक्यातील येराड-खंडूंचीवाडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय निनू जाधव (वय २१, रा. बिबी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.कृष्णात देसाई ...

पाटण/कोयनानगर : ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेम प्रकरणातून युवकाचा गळा आवळून खून करण्यात आला. पाटण तालुक्यातील येराड-खंडूंचीवाडी येथे बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय निनू जाधव (वय २१, रा. बिबी, ता. पाटण) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.कृष्णात देसाई व शिवाजी देसाई (दोघे रा. बिबी, ता. पाटण) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबी येथील अक्षय जाधव हा युवक मुबंई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. त्याचे काही वर्षांपासून नजीकच्याच एका गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. वेळोवेळी त्यांनी त्यासंदर्भात अक्षयला दमदाटी केली होती. तसेच सहा महिन्यांपूर्वी मारहाणही करण्यात आली होती. मात्र, तरीही अक्षयचे संबंधित मुलीशी प्रेमसंबंध कायम होते. रविवार, दि. ११ फेब्रुवारी रोजी अक्षय मुबंईहून गावाकडे बिबी येथे आला होता. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तो गावातीलच अविनाश जाधव या मित्राची दुचाकी घेऊन घरातून बाहेर पडला. जाताना त्याने कुटुंबीयांना काहीही सांगितले नाही. तो आसपासच कोठेतरी गेला असावा, असे समजून कुटुंबीयांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही.दरम्यान, बुधवार दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काही गुराखी जनावरे चरत येराड गावच्या हद्दीत ‘खंडूचावाडा’ नावच्या शिवारात गेले. त्यावेळी झाडाखाली युवकाचा मृतदेह त्यांना आढळून आला. गुराख्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर परिसरातील ग्रामस्थ त्याठिकाणी धावले. त्यावेळी मृत युवक अक्षय असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नीता पाडवी, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळा आवळून अक्षयचा खून झाल्याचे समोर आले. चौकशीत त्याच्या प्रेम प्रकरणाविषयीची माहितीही पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ या प्रकरणात संबंधित मुलीच्या दोन नातेवाइकांना ताब्यात घेतले.याबाबतची फिर्याद गणपत ज्ञानदेव जाधव यांनी पाटण पोलिसांत दिली आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करीत आहेत.पोलीस ठाण्यात तणावप्रेम प्रकरणातील संबंधित मुलगी व तिच्या आईला पोलीस ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृत अक्षयचे नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतला. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाटण पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची यासंदर्भात नातेवाईक व ग्रामस्थांशी चर्चा सुरू होती.