शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

लोणंदचा पालखीतळ समस्यांच्या गर्तेत

By admin | Updated: June 22, 2015 22:24 IST

माउलींची वारी : नीरा नदीकाठी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी गवत, झुडपांची वाढ--पंढरीची वाट लई अवघड :१

राहिद सय्यद - लोणंद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या वारीची ओढ अवघ्या जिल्ह्याला लागली आहे. वैष्णवांच्या मेळ्याचे स्वागत नीरा नदीतीरावर केले जाते. तसेच वारीतील पहिले आणि एकमेव अभ्यंगस्नान नीरा नदीपात्रात होते. वारकऱ्यांसाठी ही अनोखी पर्वणी असते. मात्र, नदीकिनारी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाने स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे. माउलींच्या भक्तीचा सागर अवघा महाराष्ट्र डोळे भरून पाहत असतो. मात्र, या पवित्र जागेवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. एरवी नदीकिनारी घाटावर अंत्यसंस्कार तसेच सावडण्याचे विधी होत असतात. त्याचे सर्व साहित्य तेथेच पडलेले असते. माउलींच्या रथाचे नीरा नदीच्या जुन्या पुलावरून सातारा जिल्ह्यात आगमन होते. पालखी रथ थांबवून अभ्यंगस्नानासाठी माउलींच्या पादुका रथातून हातावर घेऊन नदीपात्रात नेल्या जातात. या रस्त्याने माउलींच्या पादुका नदीपात्रात नेल्या जातात तो रस्ता उताराचा आणि खड्डेमय झाला आहे. पुरेसे अनुदान मिळावे...लोणंदमध्ये पालखी सोहळ्याचा मुक्काम अडीच दिवसांचा असतो. सर्व वारकऱ्यांना सुविधा पुरविणे फार जिकिरीचे असते. स्वच्छता, पाणीपुरवठा, सार्वजनिक शौचालय, जंतुनाशक फवारणी या सर्व बाबी सांभाळणे ग्रामपंचायतीस कठीण जाते. पालखी विसाव्यासाठी शासन ग्रामपंचायतीस जे अनुदान देते ते पुरेसे होत नाही. याकडेही लक्ष द्यायला हवे. तीर्थक्षेत्र निधीची घोषणा हवेत...तत्कालीन पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी नीरा घाटावर तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्या प्रस्तावाचा अजून एकही रुपया तीर्थक्षेत्राला मिळाला नाही. तसेच लोणंद पाणी पुरवठा केंद्रावरून वाल्हे ते फलटण पालखीचे मुक्काम असेपर्यंत टँकरने पाणी पुरवठा केला जातो. तेथे वीज कनेक्शन एक्स्प्रेस फिडर मंजूर व्हावा, अशी मागणी होत आहे.पालखीतळाची जागा वाढवून द्यावीश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी लोणंद येथील तळ अपुरा पडत आहे. यासाठी सध्याच्या तळाच्या पाठीमागील जागा पालखी तळास द्यावी किंवा नवीन जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालखी सोहळा विश्वस्त व ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली आहे.