शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

Lok Sabha Election 2019 : 'जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत उदयनराजेंशी समोरा-समोर बोलेन-नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:09 IST

लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत

ठळक मुद्देमिशी मर्दाची निशाणी; संसदेतील उपस्थिती आणि मांडलेल्या प्रश्नांबाबत केली विचारणासाताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही

सातारा : ‘लोकांच्यातून निवडून गेलेल्या खासदाराने जे प्रश्न सोडवायचे असतात, ते उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्यातील खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाहीत. आता मी २३ प्रश्न त्यांना विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्पष्ट केली नाहीत तर समोरासमोर बोलायलाही माझी तयारी आहे,’ असे जाहीर आव्हान शिवसेना उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पाटील म्हणाले, ‘उदयनराजेंनी संसदेत १० वर्षे खासदार म्हणून काम केलं. त्यांनी या काळात किती प्रश्न विचारले?, त्यांची संसदेतील हजेरी किती काळ होती?, जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याकरिता त्यांनी किती तास चर्चेत सहभाग घेतला?, जीएसटी आणि नोटबंदीच्या विषयांवर ते टीका करत आहेत, मग या निर्णयांमुळे देशातील जनतेचे काय नुकसान झालं, याबाबत त्यांनी संसदेत मत मांडलं का?, त्यांनी खासदार निधीचा वापर नेमका कोणत्या तालुक्यात आणि किती केला?, दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी जिंकल्या होत्या. त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींची त्यांनी वचनपूर्ती केली? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वंशज असल्याचे सांगतात, मग प्रतापगडाची दुरवस्था दूर करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली?, साताºयातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही?, आदी प्रश्न मी उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे उदयनराजेंनी द्यावीत.’

उदयनराजे भोसले दहा वर्षे खासदार होते. मात्र, त्यांचे कार्यालयही साताºयात नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर त्यांच्या राजवाड्याबाहेर जाऊन थांबावे लागते. त्यातूनही महाराज भेटतील, याची शक्यता अधांतरिच असते. सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. संसदेच्या माध्यमातून या शेतकºयांचे प्रश्न का सोडवता आले नाहीत?, राजवाड्यात अनेकदा चोºया झाल्या; पण एकाही चोरीबाबत खासदार उदयनराजेंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही. जिल्ह्यातील एमएच ११ व एमएच ५० या आरटीओ रजिस्ट्रेशन केलेल्या वाहनांना टोलनाका मोफत का केला नाही. जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदारांचे करोडो रुपये खासगी इन्व्हेस्टिंग कंपन्यांत अडकले आहेत, त्यांच्याबाबतही आवाज उठवला नाही. मात्र मी पुढच्या काळात हे प्रश्न धसास लावणार आहे. माझ्या प्रश्नांबाबत समोरासमोर चर्चेसाठी येण्याचे आवाहनही पाटील यांनी केले.

 

खासदार झालो तर पूर्णवेळ जन्मभूमीसाठी

खासदार झाल्यानंतर मुंबईत राहणार की साताºयात ? या प्रश्नाबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘माझी कर्मभूमी मुंबई असली तरी जन्मभूमी सातारा जिल्हा ही आहे. आमदार असताना या जन्मभूमीसाठी निधी दिला. त्यामुळे खासदार झालो तरी जास्तीत जास्त वेळ हा सातारा जिल्ह्यासाठीही देईन.’

नरेंद्र पाटील फोटो वापरावा

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले