शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 स्वकीयांच्या हल्ल्यात पक्ष, उमेदवार घायाळ ! : पक्ष सोडले; वेगळी चूल मांडण्याचाही घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 17:11 IST

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे.

ठळक मुद्देडोकेदुखी वाढली

नितीन काळेल । 

सातारा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या उमेदवाराला अडचणीत आणण्यात येत आहे. कोणी पक्ष सोडला तर कोण सोडण्याच्या वाटेवर आहे. तर कोणी वेगळी चूल मांडत आहे या प्रकारामुळे युती आणि आघाडीसाठी ही नवीच डोकेदुखी ठरली आहे.      

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून लढण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे घेण्यासाठी पावले उचलली; पण ‘हाती’ काय लागले नाही. त्यातच राष्ट्रवादीला विरोध करणाºया महाआघाडीतील सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले. त्यामुळे महाआघाडीतील काहीजण नाराज झाले. परिणामी रणजितसिंहांनी ‘हात’ सोडून कमळ जवळ  करत उमेदवारीही मिळवली; पण काँग्रेस घायाळ झालीच. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली होती. त्यावेळी जिल्ह्यात एक नंबरवर पक्ष घेऊन जाण्याच्या वल्गना सर्वांनीच मतभेद विसरून केल्या; पण रणजितसिंहांच्या भाजपमधील जाण्याने काँग्रेस बॅकफूटवरच गेली. 

राष्ट्रवादीत असणारे शेखर गोरे यांचा पक्षावर राग आहे. पाच दिवसांपूर्वी मेळावा घेऊन त्यांनी ताकद दाखवून दिलीय. तर साताºयात रविवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले व पक्षही सोडला. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा धक्काच आहे. तसेच पक्षातून बाहेर पडण्याने माण तालुक्यात पक्ष आणखी कमकुवत झाला आहे. राष्ट्रवादीला हे भगदाड मुजवता मुजवता नाकीनऊ येणार आहे. तर शेखर गोरे यांनी या निवडणुकीत माढ्यातील भाजप उमेदवाराला मदत करण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.  

जावळीतील भाजप नेते अमित कदम पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचेच; पण राजकीय घडामोडीत ते भाजपवासी झाले. ते सातारा लोकसभा मतदार संघात वेगळी चूल मांडत आहेत. शिवसेनेचा उमेदवार व युतीची नेतेमंडळी विचारात घेत नाहीत. पक्षनिष्ठेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते, हे त्यांचे व कार्यकर्त्यांच्या नाराजीचे कारण. त्यामुळे मेळावा घेऊन निवडणुकीत वेगळा विचार करू, अशा निर्णयापर्यंत कार्यकर्ते आले आहेत. युतीच्या उमेदवारासाठी ही धोक्याची घंटा ठरलीय. तसे पाहायला गेले तर उदयनराजे भोसले यांच्याबरोबर कदम यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळे ते अंतिम निर्णय काय घेतात यावर बरेच अवलंबून आहे. 

भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष सह्याद्री कदम हे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र आहेत. आजही त्यांचा तालुक्यात गट आहे. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देताना पक्षाने विचारले नसल्याची सल त्यांना होती. 

त्यामुळे मंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांना भेटून सल्लामसलत केली. मात्र, दुसºयाच दिवशी त्यांनी माढ्यातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल 

केला. त्यांचा गट किती मोठा यापेक्षा चुरस असताना एक-एक मतही महत्त्वाचे आहे. इथे कदम यांनी माघार नाही घेतली तर त्याचा परिणाम कदाचित कोणासाठी चांगला तर कोणासाठी वाईटही ठरू शकतो.  

 

डोकेदुखीवर जालीम औषधाची गरज... 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय गणिते सतत बदलत आहेत. कधी उमेदवारीवरून तर कधी विचारात घेतले नसल्याचा कारणावरून. संबंधित राजकीय नेते आणि पदाधिकाºयांची ही खदखद निवडणुकीत आपल्याच उमेदवाराला त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे यावर पक्षातीलच वरिष्ठांना औषध शोधावे लागणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसातारा