शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

Lok Sabha Election 2019 बेरजेच्या राजकारणात काँग्रेस मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:45 IST

दशरथ ननावरे । लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या ...

दशरथ ननावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. विविध पक्षांच्या बड्या नेत्यांची उड्डाणे सुरू असताना विधानसभेच्या प्रत्येक मतदार संघातही याचे पडसाद उमटू लागले आहेत. वाई विधानसभेच्या पटलांवरही ही स्थित्यंतरे दिसून येत आहेत. भाजपा, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी बेरजेचे राजकारण सुरू करीत बळ वाढविण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. बेरजेच्या राजकारणात काँग्रेसची वजाबाकी होताना दिसते.लोकसभेच्या प्रार्श्वभूमीवर राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. दोनच महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेऊन सेनापती बनलेल्या फलटणच्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपाच्या वाहत्या गंगेत झेप घेतली. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांच्या हाताला आधार उरला नसल्याची भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे. वाई मतदार संघात विधानसभेचे लक्ष्य ठेवून माजी आमदार मदन भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्याने राष्ट्रीय कॉँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हवालदिल झाल्याने पक्षाचे भवितव्य धोक्यात आले असल्याची चर्चा आहे. त्यातच वाई खंडाळ्यातील दादा गटाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजपाचा मंत्रोच्चार सुरू केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले आहेत.वाई तालुक्यातील भुर्इंज गटातून काँग्रेसकडून जिल्हा परिषद लढलेले प्रकाश दुरगुडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश करून कार्यकर्त्यांना वाट मोकळी करून दिली. खंडाळा तालुक्यातील काँग्रेसची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. वास्तविक जिल्हा परिषद निवडणुकांपासूनच काँग्रेसने मैदान सोडल्याने अनेकांनी राष्ट्रवादीचा आश्रय घेतला. त्यानंतर आमदार मकरंद पाटील यांच्या संपर्कात असलेले सगळेच काँग्रेसजण राष्ट्रवादीकडे वळले.मध्यंतरी भादे गटातील एका गावात झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात तर कॉँग्रेससह इतर पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून आता कॉँग्रेसला वाली उरला नसल्याचाच संदेश दिला. या कार्यक्रमातून मकरंद पाटील यांनी आपले स्थान मजबूत असल्याचे स्पष्ट करीत राष्ट्रवादीच्या नाराजांनाही चांगलीच चपराक दिली.वाई मतदार संघात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून आबा, दादांनी जनसंपर्क वाढवून लोकसभेच्या मैदानातच पेरणी सुरू केली. एकीकडे राष्ट्रवादी आणि भाजपाने इनकमिंगची दारे उघडी ठेवून बेरीज साधली आहे; मात्र दुसरीकडे काँग्रेसला आऊटगोर्इंग रोखता न आल्याने पक्षाची वजाबाकी सुरू आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक