शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कुलूप.. बँकेला अन् तोंडालाही!

By admin | Updated: September 1, 2015 21:28 IST

संयमाची कसोटी : सुमारे ७४ हजार ठेवीदारांच्या १०४ कोटी रकमेला विमा संरक्षण; मात्र कोणत्या बँकेत विलिनीकरण ?--‘जिजामाता’ची अर्थकोंडी : एक

सातारा : जिजामाता बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर भीतीने गाळण उडालेल्या ठेवीदारांचा संयम संपत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बँकेच्या कार्यालयाला जसे कुलूप आहे, तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची तोंडेही बंद झाली आहेत. मात्र सुमारे ७४ हजार ठेवीदारांच्या ठेवी एक लाखाच्या आतील असल्याने त्यांना विमा संरक्षण आहे. उर्वरित ९४० ठेवीदारांच्या संयमाची कसोटी पाहणारा हा काळ असून, ‘रक्कम कधी मिळेल’ या प्रश्नाला उत्तर नसल्याने भीती वाढत आहे. व्यवहारांतील अनियमिततांचे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेवर निर्बंध लादून महिना उलटून गेला आहे. या निर्बंधांनुसार, एक हजारावर रक्कम कोणत्याही ठेवीदाराला खात्यातून काढता येत नाही. परिणामी, घाबरलेले ठेवीदार कधी बँकेत तर कधी सहकार उपनिबंधक कार्यालयात ‘त्राही माम, त्राही माम’ करीत दाद मागत आहेत. या भयकंपित ठेवीदारांना सुरक्षिततेची हमी देताना बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला आहे. या पार्श्वभूमीवर, बँकेच्या सद्य:स्थितीचा धांडोळा घेतला असता, तीन पर्याय समोर दिसत आहेत. परंतु सर्वच पर्याय वेळखाऊ असल्याने ठेवीदार किती संयम राखतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. बँकेतील अनियमिततांची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. यातून प्रत्येक अनियमिततेची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. दुसरा पर्याय, ठेवी-कर्जांचे गुणोत्तर पाहणे आणि बँकेची गुंतवणूक, मालमत्तेचे मूल्यमापन करण्याचा आहे. ठेवींच्या रकमेचा विचार करता, हे मूल्य अधिक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी हा मार्गही बराच वेळखाऊ आहे. तिसरा पर्याय अर्थातच, बँकेच्या विलीनीकरणाचा (मर्जर) आहे. काही बँका यासाठी पुढे आल्या असल्याचे सहकार खात्याकडून समजते. मात्र, या बँकाही आपला स्वतंत्र लेखापरीक्षक नेमून आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याने ठेवीदारांपुढे ‘वेट अँड वॉच’ भूमिका पत्करण्याव्यतिरिक्त पर्याय तूर्त तरी दिसत नाही. महाराष्ट्र सहकार कायद्याच्या (१९६०) कलम ८८ अन्वये सहकार खात्याने मेढ्याचे सहायक निबंधक उमेश उंबरदंड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अनियमिततेची शंका असलेल्या आठ मुद्द्यांवर ही चौकशी होईल आणि त्या-त्या व्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. अशा चौकशीसाठी दोन वर्षांची मुदत असते; तथापि, उंबरदंड यांना सहा महिन्यांत ही चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे. बँकेचे फेरलेखापरीक्षण करण्याचा पर्याय सहकार खात्याकडे असून, तसे आदेश देण्याचा अधिकार विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांनाच आहे. आगामी काळात असा फेरलेखापरीक्षणाचा आदेश निघू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)बँकेने ८० कोटींचे कर्जवितरण केले आहे. हे संपूर्ण कर्ज वसूल केले तरी ठेवींची रक्कम पूर्ण होत नाही; मात्र बँकेने सरकारी रोख्यांमध्ये गुंतविलेले सुमारे ३० कोटी विचारात घेता ही रक्कम ११० कोटींच्या घरात जाते.याखेरीज बँकेच्या मालमत्तांचे मूल्यही बरेच असल्याने ठेवीदारांना आशेचा किरण असल्याचे सहकार क्षेत्रातील माहीतगारांचे म्हणणे आहे.कर्ज-ठेवींची सद्य:स्थितीजिजामाता बँकेत ठेवीदारांच्या एकूण १०४ कोटींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.एक लाखांपेक्षा कमी ठेव असणाऱ्या (विमा संरक्षित) ठेवीदारांची संख्या ७३ हजार ९४० असून, त्यांनी बँकेत गुंतविलेली एकूण रक्कम ८० कोटींच्या घरात आहे.एक लाखांपेक्षा अधिक ठेव असणाऱ्या (बिगर संरक्षित) ठेवीदारांची संख्या ९४० असून, त्यांनी बँकेत गुंतविलेली एकूण रक्कम २४ कोटींच्या घरात आहे.