शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

कुलूप.. बँकेला अन् तोंडालाही!

By admin | Updated: September 1, 2015 21:28 IST

संयमाची कसोटी : सुमारे ७४ हजार ठेवीदारांच्या १०४ कोटी रकमेला विमा संरक्षण; मात्र कोणत्या बँकेत विलिनीकरण ?--‘जिजामाता’ची अर्थकोंडी : एक

सातारा : जिजामाता बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्यानंतर भीतीने गाळण उडालेल्या ठेवीदारांचा संयम संपत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून या बँकेच्या कार्यालयाला जसे कुलूप आहे, तसेच संबंधित पदाधिकाऱ्यांची तोंडेही बंद झाली आहेत. मात्र सुमारे ७४ हजार ठेवीदारांच्या ठेवी एक लाखाच्या आतील असल्याने त्यांना विमा संरक्षण आहे. उर्वरित ९४० ठेवीदारांच्या संयमाची कसोटी पाहणारा हा काळ असून, ‘रक्कम कधी मिळेल’ या प्रश्नाला उत्तर नसल्याने भीती वाढत आहे. व्यवहारांतील अनियमिततांचे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने जिजामाता महिला सहकारी बँकेवर निर्बंध लादून महिना उलटून गेला आहे. या निर्बंधांनुसार, एक हजारावर रक्कम कोणत्याही ठेवीदाराला खात्यातून काढता येत नाही. परिणामी, घाबरलेले ठेवीदार कधी बँकेत तर कधी सहकार उपनिबंधक कार्यालयात ‘त्राही माम, त्राही माम’ करीत दाद मागत आहेत. या भयकंपित ठेवीदारांना सुरक्षिततेची हमी देताना बँकेच्या पदाधिकाऱ्यांसह सहकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही घाम फुटला आहे. या पार्श्वभूमीवर, बँकेच्या सद्य:स्थितीचा धांडोळा घेतला असता, तीन पर्याय समोर दिसत आहेत. परंतु सर्वच पर्याय वेळखाऊ असल्याने ठेवीदार किती संयम राखतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. बँकेतील अनियमिततांची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती झाली आहे. यातून प्रत्येक अनियमिततेची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. दुसरा पर्याय, ठेवी-कर्जांचे गुणोत्तर पाहणे आणि बँकेची गुंतवणूक, मालमत्तेचे मूल्यमापन करण्याचा आहे. ठेवींच्या रकमेचा विचार करता, हे मूल्य अधिक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी हा मार्गही बराच वेळखाऊ आहे. तिसरा पर्याय अर्थातच, बँकेच्या विलीनीकरणाचा (मर्जर) आहे. काही बँका यासाठी पुढे आल्या असल्याचे सहकार खात्याकडून समजते. मात्र, या बँकाही आपला स्वतंत्र लेखापरीक्षक नेमून आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याने ठेवीदारांपुढे ‘वेट अँड वॉच’ भूमिका पत्करण्याव्यतिरिक्त पर्याय तूर्त तरी दिसत नाही. महाराष्ट्र सहकार कायद्याच्या (१९६०) कलम ८८ अन्वये सहकार खात्याने मेढ्याचे सहायक निबंधक उमेश उंबरदंड यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. अनियमिततेची शंका असलेल्या आठ मुद्द्यांवर ही चौकशी होईल आणि त्या-त्या व्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. अशा चौकशीसाठी दोन वर्षांची मुदत असते; तथापि, उंबरदंड यांना सहा महिन्यांत ही चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे. बँकेचे फेरलेखापरीक्षण करण्याचा पर्याय सहकार खात्याकडे असून, तसे आदेश देण्याचा अधिकार विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग यांनाच आहे. आगामी काळात असा फेरलेखापरीक्षणाचा आदेश निघू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)बँकेने ८० कोटींचे कर्जवितरण केले आहे. हे संपूर्ण कर्ज वसूल केले तरी ठेवींची रक्कम पूर्ण होत नाही; मात्र बँकेने सरकारी रोख्यांमध्ये गुंतविलेले सुमारे ३० कोटी विचारात घेता ही रक्कम ११० कोटींच्या घरात जाते.याखेरीज बँकेच्या मालमत्तांचे मूल्यही बरेच असल्याने ठेवीदारांना आशेचा किरण असल्याचे सहकार क्षेत्रातील माहीतगारांचे म्हणणे आहे.कर्ज-ठेवींची सद्य:स्थितीजिजामाता बँकेत ठेवीदारांच्या एकूण १०४ कोटींच्या ठेवी अडकून पडल्या आहेत.एक लाखांपेक्षा कमी ठेव असणाऱ्या (विमा संरक्षित) ठेवीदारांची संख्या ७३ हजार ९४० असून, त्यांनी बँकेत गुंतविलेली एकूण रक्कम ८० कोटींच्या घरात आहे.एक लाखांपेक्षा अधिक ठेव असणाऱ्या (बिगर संरक्षित) ठेवीदारांची संख्या ९४० असून, त्यांनी बँकेत गुंतविलेली एकूण रक्कम २४ कोटींच्या घरात आहे.