शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

लॉक‘डाऊन’.. कोरोना ‘अप’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

सातारा : राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू केली. मात्र या ...

सातारा : राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीचा सातारा जिल्ह्यात फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. कारण १५ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू करतानाच निर्बंधही अधिक कठोर केले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे चार तासात साताराच नव्हे तर जिल्ह्याची बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येत आहेत अन् हीच गोष्ट कोरोनाचे संक्रमण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

संचारबंदीच्या कालावधीत कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे वाटत होते; परंतु सातारा जिल्ह्याच्या बाबतीत या उलट घडू लागले आहे. संचारबंदीच्या अगोदर रुग्ण संख्या कमी होती. तर संचारबंदी लागू झाल्यानंतर बाधितांचे संख्येने नवे उच्चांक प्रस्थापित केले. कधी नव्हे ते कोरोना बाधितांनी २४ तासांत दोन हजारांचा टप्पाही ओलांडला. संचारबंदी लागू झाल्यापासून केवळ पंधरा दिवसांत जिल्ह्यात २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा आकडा धडकी भरवणारा असाच आहे.

(चौकट)

शाळा, महाविद्यालय ताब्यात घ्या..

बेडची संख्या कमी रुग्ण संख्या जास्त अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली आहे. त्यामुळे १३ हजारांहून अधिक रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. प्रशासनाकडून गृहविलगीकरणातील रुग्णांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. अनेक रुग्ण शहरात खरेदी तसेच औषधोपचारासाठी स्वत: ये-जा करतात. अशा रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकही पथक नाही. केवळ प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे. अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय बंद आहेत. या ठिकाणी गृहविलगीकरणाची व्यवस्था केल्यास कोरोना बाधितांवर उपचार करणे सोपे होऊ शकते.

(पॉइंटर)

हे करण्याची गरज

- संचारबंदी असली तरी लपून-छपून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

- या नागरिकांची जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे.

- बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवावे.

- कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे ट्रेसिंग करावे

- प्रतिबंधात क्षेत्रात पाळीपाळीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी

- संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी.

(पॉइंटर)

जिल्ह्यात असा वाढतोय कोरोना

दिनांक कोरोनाबाधित मृत्यू

१५ ११८४ २२

१६ १३९५ १५

१७ १५४३ ३८

१८ १४३४ ३३

१९ १२१२ ४१

२० १५७१ ३६

२१ १६९५ ३७

२२ १८१६ २८

२३ १७४५ ३४

२४ २००१ ३४

२५ १९३३ ३९

२६ १४३४ २६

२७ १६६६ ३३

२८ १८१० ३४

२९ २२५६ ४२

एकूण २४६९५ ४९२