शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

लॉक‘डाऊन’.. कोरोना ‘अप’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:50 IST

सातारा : राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू केली. मात्र या ...

सातारा : राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि. १५ ते ३० एप्रिल या कालावधीत संचारबंदी लागू केली. मात्र या संचारबंदीचा सातारा जिल्ह्यात फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. कारण १५ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

राज्यासह सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. दररोज दीड हजारांहून अधिक रुग्ण आढळून येऊ लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू करतानाच निर्बंधही अधिक कठोर केले आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे चार तासात साताराच नव्हे तर जिल्ह्याची बाजारपेठ गर्दीने गजबजून जात आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात एकमेकांच्या संपर्कात येत आहेत अन् हीच गोष्ट कोरोनाचे संक्रमण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

संचारबंदीच्या कालावधीत कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे वाटत होते; परंतु सातारा जिल्ह्याच्या बाबतीत या उलट घडू लागले आहे. संचारबंदीच्या अगोदर रुग्ण संख्या कमी होती. तर संचारबंदी लागू झाल्यानंतर बाधितांचे संख्येने नवे उच्चांक प्रस्थापित केले. कधी नव्हे ते कोरोना बाधितांनी २४ तासांत दोन हजारांचा टप्पाही ओलांडला. संचारबंदी लागू झाल्यापासून केवळ पंधरा दिवसांत जिल्ह्यात २४ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा आकडा धडकी भरवणारा असाच आहे.

(चौकट)

शाळा, महाविद्यालय ताब्यात घ्या..

बेडची संख्या कमी रुग्ण संख्या जास्त अशी अवस्था सातारा जिल्ह्याची झाली आहे. त्यामुळे १३ हजारांहून अधिक रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. प्रशासनाकडून गृहविलगीकरणातील रुग्णांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. अनेक रुग्ण शहरात खरेदी तसेच औषधोपचारासाठी स्वत: ये-जा करतात. अशा रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात एकही पथक नाही. केवळ प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे. अशा रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवल्यास अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात. सद्यस्थितीत जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय बंद आहेत. या ठिकाणी गृहविलगीकरणाची व्यवस्था केल्यास कोरोना बाधितांवर उपचार करणे सोपे होऊ शकते.

(पॉइंटर)

हे करण्याची गरज

- संचारबंदी असली तरी लपून-छपून जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

- या नागरिकांची जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वीच कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे.

- बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात ठेवावे.

- कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांचे ट्रेसिंग करावे

- प्रतिबंधात क्षेत्रात पाळीपाळीने सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी

- संचारबंदी, फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी.

(पॉइंटर)

जिल्ह्यात असा वाढतोय कोरोना

दिनांक कोरोनाबाधित मृत्यू

१५ ११८४ २२

१६ १३९५ १५

१७ १५४३ ३८

१८ १४३४ ३३

१९ १२१२ ४१

२० १५७१ ३६

२१ १६९५ ३७

२२ १८१६ २८

२३ १७४५ ३४

२४ २००१ ३४

२५ १९३३ ३९

२६ १४३४ २६

२७ १६६६ ३३

२८ १८१० ३४

२९ २२५६ ४२

एकूण २४६९५ ४९२