शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

स्थानिक आमदार म्हणूनच निवडणुकीत लक्ष

By admin | Updated: April 14, 2016 21:25 IST

मकरंद पाटील : निकाल लक्षात आल्याने विरोधकांनी खालची पातळी गाठल्याचा आरोप

लोणंद : ‘राष्ट्रवादी काँगे्रसने लोणंद शहरामध्ये जनतेला विश्वासात घेऊन विकासकामे केली आहेत. प्रचारातील राष्ट्रवादीची सरशी झाल्याने विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन राष्ट्रवादीला बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले होते. स्थानिक आमदार म्हणून या निवडणुकीत लक्ष घालण्याचा माझा अधिकार आहे; पण माझा धसका घेतलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेली आहे. त्यामुळेच ते सैरभैर झाले आहेत,’ अशी टीका आमदार मकरंद पाटील यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, रमेश धायगुडे, अनिता शेळके, मनोज पवार, विठ्ठल शेळके, भरत शेळके, नंदाताई गायकवाड, दादासो ठोंबरे उपस्थित होते.आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘लोणंद शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीने दूरदृष्टी विकास आराखडा आखला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून ही कामे करण्यासाठी स्थानिक आमदारांचे सहकार्य आवश्यक असते. मतदारसंघातील तीनही नगरपालिकांच्या कामकाजाचा अनुभव आम्हाला आहे. विकासाचा रथ आम्ही पुढे नेऊ. निवडणूक प्रचारात जे विरोधक प्रचार करत आहेत, त्यातील एकालाही नगरपालिकेचा अनुभव नाही. फक्त रावणाच्या गप्पा मारायच्या, जनतेला फसवायचे या वृत्तीला जनता थारा देणार नाही. मंत्री, संत्री आणि बाहेरचे आमदार आणून विकासकामे होणार नाहीत.’आनंदराव शेळके-पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीने तीन वर्षांत केलेली कामे पाहूनच जनता त्यांच्या पाठीशी राहील, विकासकामे संपत नाहीत; पण ती करण्याची धमक राष्ट्रवादीत आहे. विरोधकांना आता प्रचाराला मुद्दाच उरला नाही. त्यामुळे गुद्द्यावर येण्याचे प्रकार घडवत आहेत. अपप्रचार करून मते मिळतील या भ्रमात त्यांनी राहू नये. चांगल्या, वाईट प्रवृत्तीची जाण जनतेला आहे. राष्ट्रवादीच्या पाठीशी राहून जनताच इतिहास घडवेल.’सभापती नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘आज प्रचारात विरोधी बाजूने गप्पा मारणारे बाहेरचे गडी निवडणुकीनंतर गायब होतील. त्यामुळे त्यांच्या नादाला लागण्याचे पाप करू नका. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाचा धसका घेऊन राज्य मंत्रिमंडळाची फौज, बाहेरचे आमदार, खासदार विरोधकांनी प्रचारात उतरविले आहेत.’विरोधकांनी बिनबुडाचे आरोप चालविले आहेत; पण आमदारांच्या विरोधात वेडेवाकडे बोलाल तर खपवून घेतले जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. सर्वात चांगली नगरपंचायत बनविण्यासाठी राष्ट्रवादीच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.भरत शेळके म्हणाले, ‘या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनता इतिहास घडवेल. काँग्रेसचे नेते बाळासाहेब बागवान यांना धडा शिकविण्याचा विडा जनतेने उचलला आहे. थापा मारून राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. जनतेला आता विकास हवाय जो फक्त राष्ट्रवादीच करू शकते.’ (वार्ताहर)बोलणाऱ्यांना पदे आम्हीच दिलीविरोधी पक्षात जाऊन टीका करणारे विनोद क्षीरसागर यांना सभापतिपद राष्ट्रवादीमुळेच मिळाले; पण त्याचा उपयोग लोणंदकरांसाठी किती केला याची माहिती आदी जनतेला द्यावी. पदापुरतं स्वार्थी राजकारण करणाऱ्यांना लोणंदकरांनी बाजूला सारावे, असे आवाहन सभेत केले.मतांसाठी चक्क आमदार दारोदारीबाळासाहेब बागवान : चार वर्षांत लोणंदच्या कारभारात घोटाळाचलोणंद : ‘राष्ट्रवादीने नगरपंचायतीला विरोध तर केलाच; पण मंत्रालयात प्रस्तावाच्या फाईल अडवण्याचे काम नेत्यांनी केले. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना निवडून दिलेल्या जनतेच्या प्रश्नासाठी सरकारला जाब विचारून धारेवर धरायचे सोडून विद्यमान आमदार दारोदारी मतांसाठी फिरत आहेत. एवढी खालची पातळी राज्यात कुठल्या आमदारांनी गाठली नसेल,’ अशी खरपूस टीका काँग्रेसचे अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी केली.लोणंद नगरपंचायतीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल घाडगे, मस्कूअण्णा शेळके, दत्तात्रय खरात, सचिन शेळके, दशरथ क्षीरसागर, विकास केदारी, स्वप्नील क्षीरसागर, बाळासाहेब शेळके, इम्रान बागवान, अ‍ॅड. हेमंत खरात, बबलू मनेर आदी प्रमुख उपस्थित होते.बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘राष्ट्रवादीच्या चार वर्षांच्या काळात झालेल्या घोटाळ्याने स्थानिक नेत्यांचे हात बरबटलेले आहेत. नगरपंचायतीला खोडा घालून स्वार्थ साधणारी राष्ट्रवादीची ही मंडळी जनतेची फसवणूक करीत आहे. विकासाच्या गप्पा मारण्यात राष्ट्रवादी मश्गूल आहे; पण लोणंदच्या विकासाचा बट्याबोळ राष्ट्रवादीनेच केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून देऊ नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.राहुल घाडगे म्हणाले, ‘प्रत्येक प्रभागात जाऊन सांगावे असे राष्ट्रवादीने कोणतेच काम केले नाही. जनतेच्या आवश्यक विकासकामांची दूरदृष्टी विरोधकांकडे नाही.’ मस्कूअण्णा शेळके म्हणाले, ‘लोणंदला नगरपंचायतीची दिशा काँंग्रेसमुळे मिळाली. काँग्रेसने पंधरा वर्षांत केलेला विकास जनतेसमोर आहे. राष्ट्रवादीने गप्पामारण्यापेक्षा केलेल्या कामांची यादी जाहीर करावी.’ (वार्ताहर)