शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

लिंब सोसायटी : दफ्तर गहाळप्रकरणी कारवाईकडे लक्ष

सातारा : तालुक्यातील राजकीयदृ्ष्ट्या संवेदनशील म्हणून लिंब गावचा उल्लेख होतो. याच लिंब मधील विकास सेवा सोसायटीचे दप्तर गहाळ केल्याप्रकरणी सातारा तालुका उपनिबंधक कार्यालयाने अखेर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबतच्या कारवाईकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.लिंबमधील विकास सेवा सोसायटीचे सभासद तुळशीदास नामदेव पवार यांना केंद्र शासन कर्जमाफी मिळाली होती. अंतर्गत २००८ मध्ये १७८२ रुपये कर्जमाफी मिळाली होती. तसेच राज्य शासन कर्जमाफ अंतर्गत वीस हजार रुपये कर्जमाफी मिळाली होती. पवार यांना मिळालेल्या कर्जमाफी रकमेचा अपहार करण्यात आला. या अपहारास जबाबदार असणारे सोसायटीचे तत्कालीन सचिव दत्तात्रय पांडुरंग निकम व तत्कालीन चेअरमन यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा सातारा तालुका सरचिटणीस राजेश शेटे यांनी तक्रार दाखल केली होती.दरम्यान, या कर्जमाफी अपहारासंदर्भात दप्तराची वेळोवेळी मागणी करूनही न देता त्यांनी ते गहाळ केले. चौकशीदरम्यान संबंधित दप्तर देण्यास नकार दिला. याबाबत तुळशीदास पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भात शेटे यांनी हे प्रकरण जिल्हा पातळीवरून कोल्हापूरच्या विभागीय पातळीवर नेऊन संबंधित सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली. त्यास अखेर विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी सचिव आणि चेअरमन यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याबाबत सहायक निबंधक सातारा यांना आदेश दिले होते. तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याबाबत आदेश देऊनही फौजदारी दाखल करण्यास संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर दहा दिवसांनंतर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘याप्रकरणाच्या तपासात कोणतीही हयगय न करता आरोपीवर कठोर कारवाई करणार आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कर्जमाफीच्या प्रकरणात घडतंय-बिघडतंयशेतकरी कर्जमाफी प्रकरणाचा फायदा नेमका कुणाला झाला. याचा शोध कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेतला जात आहे. ग्रामीण भागांत सोसायट्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची माफी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली. मात्र, अनेक ठिकाणी कर्जमाफी प्रक्रियेत सावळागोंधळ झाल्याचंच अनेकवेळा उघडकीस आलं आहे. यावर नेहमीच उलट-सुलट बोललं जातं. सहकार विभागानं यातील सत्य लोकांपुढं आणण्याची गरज निर्माण झाली आहे.