शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

लिंब सोसायटी : दफ्तर गहाळप्रकरणी कारवाईकडे लक्ष

सातारा : तालुक्यातील राजकीयदृ्ष्ट्या संवेदनशील म्हणून लिंब गावचा उल्लेख होतो. याच लिंब मधील विकास सेवा सोसायटीचे दप्तर गहाळ केल्याप्रकरणी सातारा तालुका उपनिबंधक कार्यालयाने अखेर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबतच्या कारवाईकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.लिंबमधील विकास सेवा सोसायटीचे सभासद तुळशीदास नामदेव पवार यांना केंद्र शासन कर्जमाफी मिळाली होती. अंतर्गत २००८ मध्ये १७८२ रुपये कर्जमाफी मिळाली होती. तसेच राज्य शासन कर्जमाफ अंतर्गत वीस हजार रुपये कर्जमाफी मिळाली होती. पवार यांना मिळालेल्या कर्जमाफी रकमेचा अपहार करण्यात आला. या अपहारास जबाबदार असणारे सोसायटीचे तत्कालीन सचिव दत्तात्रय पांडुरंग निकम व तत्कालीन चेअरमन यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा सातारा तालुका सरचिटणीस राजेश शेटे यांनी तक्रार दाखल केली होती.दरम्यान, या कर्जमाफी अपहारासंदर्भात दप्तराची वेळोवेळी मागणी करूनही न देता त्यांनी ते गहाळ केले. चौकशीदरम्यान संबंधित दप्तर देण्यास नकार दिला. याबाबत तुळशीदास पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भात शेटे यांनी हे प्रकरण जिल्हा पातळीवरून कोल्हापूरच्या विभागीय पातळीवर नेऊन संबंधित सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली. त्यास अखेर विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी सचिव आणि चेअरमन यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याबाबत सहायक निबंधक सातारा यांना आदेश दिले होते. तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याबाबत आदेश देऊनही फौजदारी दाखल करण्यास संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर दहा दिवसांनंतर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘याप्रकरणाच्या तपासात कोणतीही हयगय न करता आरोपीवर कठोर कारवाई करणार आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कर्जमाफीच्या प्रकरणात घडतंय-बिघडतंयशेतकरी कर्जमाफी प्रकरणाचा फायदा नेमका कुणाला झाला. याचा शोध कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेतला जात आहे. ग्रामीण भागांत सोसायट्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची माफी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली. मात्र, अनेक ठिकाणी कर्जमाफी प्रक्रियेत सावळागोंधळ झाल्याचंच अनेकवेळा उघडकीस आलं आहे. यावर नेहमीच उलट-सुलट बोललं जातं. सहकार विभागानं यातील सत्य लोकांपुढं आणण्याची गरज निर्माण झाली आहे.