शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

कर्जमाफीप्रकरणात तत्कालीन चेअरमन, सचिवावर गुन्हा दाखल

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

लिंब सोसायटी : दफ्तर गहाळप्रकरणी कारवाईकडे लक्ष

सातारा : तालुक्यातील राजकीयदृ्ष्ट्या संवेदनशील म्हणून लिंब गावचा उल्लेख होतो. याच लिंब मधील विकास सेवा सोसायटीचे दप्तर गहाळ केल्याप्रकरणी सातारा तालुका उपनिबंधक कार्यालयाने अखेर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबतच्या कारवाईकडे आता सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.लिंबमधील विकास सेवा सोसायटीचे सभासद तुळशीदास नामदेव पवार यांना केंद्र शासन कर्जमाफी मिळाली होती. अंतर्गत २००८ मध्ये १७८२ रुपये कर्जमाफी मिळाली होती. तसेच राज्य शासन कर्जमाफ अंतर्गत वीस हजार रुपये कर्जमाफी मिळाली होती. पवार यांना मिळालेल्या कर्जमाफी रकमेचा अपहार करण्यात आला. या अपहारास जबाबदार असणारे सोसायटीचे तत्कालीन सचिव दत्तात्रय पांडुरंग निकम व तत्कालीन चेअरमन यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भाजपा सातारा तालुका सरचिटणीस राजेश शेटे यांनी तक्रार दाखल केली होती.दरम्यान, या कर्जमाफी अपहारासंदर्भात दप्तराची वेळोवेळी मागणी करूनही न देता त्यांनी ते गहाळ केले. चौकशीदरम्यान संबंधित दप्तर देण्यास नकार दिला. याबाबत तुळशीदास पवार यांच्या कर्जमाफीसंदर्भात शेटे यांनी हे प्रकरण जिल्हा पातळीवरून कोल्हापूरच्या विभागीय पातळीवर नेऊन संबंधित सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याची मागणी केली. त्यास अखेर विभागीय सहायक निबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर विभागाचे राजेंद्रकुमार दराडे यांनी सचिव आणि चेअरमन यांच्याविरुद्ध फौजदारी दाखल करण्याबाबत सहायक निबंधक सातारा यांना आदेश दिले होते. तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर फौजदारी दाखल करण्याबाबत आदेश देऊनही फौजदारी दाखल करण्यास संबंधित विभागाने दुर्लक्ष केले होते. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केल्याने अखेर दहा दिवसांनंतर सोसायटीच्या तत्कालीन सचिव आणि चेअरमनवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला असून, याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार फरांदे करीत आहेत.दरम्यान, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी याप्रकरणी सखोल तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘याप्रकरणाच्या तपासात कोणतीही हयगय न करता आरोपीवर कठोर कारवाई करणार आहे. कोणालाही पाठीशी न घालण्याची त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी) कर्जमाफीच्या प्रकरणात घडतंय-बिघडतंयशेतकरी कर्जमाफी प्रकरणाचा फायदा नेमका कुणाला झाला. याचा शोध कुठल्या ना कुठल्या मार्गाने घेतला जात आहे. ग्रामीण भागांत सोसायट्यामार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जाची माफी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली. मात्र, अनेक ठिकाणी कर्जमाफी प्रक्रियेत सावळागोंधळ झाल्याचंच अनेकवेळा उघडकीस आलं आहे. यावर नेहमीच उलट-सुलट बोललं जातं. सहकार विभागानं यातील सत्य लोकांपुढं आणण्याची गरज निर्माण झाली आहे.