शहरं
Join us  
Trending Stories
1
School Bus Accident: भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
'मराठी मोर्चा' रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...
4
डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान देणं मस्क यांना महागात? आधी टेस्ला गडगडली, आता संपत्तीला खिंडार!
5
व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा
6
 F&O नं दिलाय जोरदार झटका, आर्थिक वर्षात गुंतवणूकदारांचे ₹१.०६ लाख कोटी बुडाले; SEBI नं काय म्हटलं?
7
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
8
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
9
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
10
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
11
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
12
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
13
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
14
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
15
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
16
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
17
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
18
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
19
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
20
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."

सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

By admin | Updated: February 10, 2015 00:25 IST

पाटण तालुका : रस्ता, स्मशानभूमी, वैद्यकीय सेवांची कमतरता; पाण्यासाठी रोजचीच पायपीट

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला डोंगरदऱ्यात वसलेले पाटण तालुक्यातील सातर हे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावाअंतर्गत महाळुंगेवाडी, लखनवस्ती, धनगरवाडा, सुतारवाडा या वस्त्यांचा समावेश असून, या वाड्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या वस्त्यांना विकास कशाला म्हणतात, याची अद्याप जाणीवच नाही. येथील लोक अद्यापही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. या गावाला पुढाऱ्यांनी निवडणुकीत फक्त आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही शून्य असल्याचे दिसते.सातर गावात जाण्यासाठी रस्ता नाही. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. शाळेच्या इमारतीची गैरसोय. जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. अशा एक नव्हे, तर अनेक सुविधांचा वानवा आहे. त्यामुळे येथील लोकांना जगणं महाग झालंय. स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, शेड बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी देत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाली तर अंत्यसंस्कारासाठी पाऊस जाईपर्यंत ताटकळत बसावे लागते. विधीपूर्ण होऊपर्यंत त्याचठिकाणी थांबावे लागते. गावात दळणवळणाची मोठी गैरसोय आहे. येण्या-जाण्यासाठी वाहतूक नसल्याने पाच ते सात किलोमीटर पायी चालतच प्रवास करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी आजही डोलीचा वापर करावा लागतो. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मात्र, शाळेसाठी पुरेशी इमारत नाही. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. तसेच वर्षानुवर्षे भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. पिण्याचे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे डोंगरातून पाईपलाईन करून गावात आणण्यात आले आहे. मात्र डोंगरात चरावयास गेलेल्या जनावरांमुळे पाईपलाईन सारखी फुटत असते. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात पिण्यासाठी लोकांना रात्रंदिवस डोंगर दऱ्यात भटकावे लागत असते. त्यातच जंगली जनावरांचा वाढता त्रासामुळे लोक हैराण होत आहेत. (वार्ताहर)नेत्यांची आश्वासने निवडणुकापुरतेचदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली. मात्र, आम्ही अजूनही पारतंत्र्यातच आहे. आम्ही आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहे. गावात अनेक सुविधांचा वानवा आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीवेळीच मतासाठी गावात येतात, आश्वासने देतात; मात्र निवडणूक झाली की त्यांना त्याचा विसर पडतो. - अंकुश साळुंखे, माजी सरपंच, सातर