शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

सातर गावात जगणं महाग, मरण स्वस्त!

By admin | Updated: February 10, 2015 00:25 IST

पाटण तालुका : रस्ता, स्मशानभूमी, वैद्यकीय सेवांची कमतरता; पाण्यासाठी रोजचीच पायपीट

सणबूर : वांग-मराठवाडी धरणाच्या एका टोकाला डोंगरदऱ्यात वसलेले पाटण तालुक्यातील सातर हे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावाअंतर्गत महाळुंगेवाडी, लखनवस्ती, धनगरवाडा, सुतारवाडा या वस्त्यांचा समावेश असून, या वाड्या अनेक सुविधांपासून वंचित आहेत. या वस्त्यांना विकास कशाला म्हणतात, याची अद्याप जाणीवच नाही. येथील लोक अद्यापही आदिवासींसारखे जीवन जगत आहेत. या गावाला पुढाऱ्यांनी निवडणुकीत फक्त आश्वासने दिली. प्रत्यक्षात मात्र कार्यवाही शून्य असल्याचे दिसते.सातर गावात जाण्यासाठी रस्ता नाही. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. शाळेच्या इमारतीची गैरसोय. जाण्या-येण्यासाठी रस्ता नाही. अशा एक नव्हे, तर अनेक सुविधांचा वानवा आहे. त्यामुळे येथील लोकांना जगणं महाग झालंय. स्मशानभूमी नसल्याने मृत्यूनंतरही मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. गावात स्मशानभूमी नसल्याने आपल्या शेतातच अंत्यसंस्कार करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. मात्र, शेड बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी निधी देत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. पावसाळ्यात एखादी व्यक्ती मयत झाली तर अंत्यसंस्कारासाठी पाऊस जाईपर्यंत ताटकळत बसावे लागते. विधीपूर्ण होऊपर्यंत त्याचठिकाणी थांबावे लागते. गावात दळणवळणाची मोठी गैरसोय आहे. येण्या-जाण्यासाठी वाहतूक नसल्याने पाच ते सात किलोमीटर पायी चालतच प्रवास करावा लागतो. आजारी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी आजही डोलीचा वापर करावा लागतो. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. मात्र, शाळेसाठी पुरेशी इमारत नाही. शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे. तसेच वर्षानुवर्षे भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. पिण्याचे पाणी ग्रॅव्हिटीद्वारे डोंगरातून पाईपलाईन करून गावात आणण्यात आले आहे. मात्र डोंगरात चरावयास गेलेल्या जनावरांमुळे पाईपलाईन सारखी फुटत असते. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होण्याचे प्रकार घडतात. उन्हाळ्यात पिण्यासाठी लोकांना रात्रंदिवस डोंगर दऱ्यात भटकावे लागत असते. त्यातच जंगली जनावरांचा वाढता त्रासामुळे लोक हैराण होत आहेत. (वार्ताहर)नेत्यांची आश्वासने निवडणुकापुरतेचदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली. मात्र, आम्ही अजूनही पारतंत्र्यातच आहे. आम्ही आजही आदिवासींसारखे जीवन जगत आहे. गावात अनेक सुविधांचा वानवा आहे. लोकप्रतिनिधी निवडणुकीवेळीच मतासाठी गावात येतात, आश्वासने देतात; मात्र निवडणूक झाली की त्यांना त्याचा विसर पडतो. - अंकुश साळुंखे, माजी सरपंच, सातर