शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पालखीमार्गावरून थेट संघर्षमार्गावर...

By admin | Updated: February 25, 2015 00:08 IST

मसूरमध्ये तणाव : पोलीस ठाणे, ग्रामपंचायतीसमोर धनगर समाजाचा ठिय्या

मसूर : येथील बिरोबा मंदिराकडे जाणारा पालखीमार्ग एका शेतकऱ्याने अडविल्यामुळे हे प्रकरण संघर्षाच्या मार्गावर निघाले होते. संतापलेल्या धनगर समाजाने पालखी मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेत मसूर पोलीस व ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला. पोलीस, राजकीय पदाधिकारी, समाजबांधव व संबंधित शेतकरी यांच्यात बैठक होऊन तोडगा निघाल्याने धार्मिक तणाव निवळला. धनगर समाजाच्या वतीने सांगण्यात आले की कराड-मसूर रस्त्यापासून जवळच धनगर समाजाचे श्री बिरोबा देवस्थान आहे. त्याठिकाणी ३०० वर्षांपासून यात्रा भरते. या देवस्थानकडे जाण्यासाठी एक रस्ता आहे. तो सर्व्हे नंबर व नकाशावर आहे. तो रहदारीसाठी खुला करावा, यासाठी तहसीलदार धनगर समाजाच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे. त्यामुळे ‘तुम्ही सह्या का केल्या,’ या कारणावरून चिडून जाऊन एका शेतकऱ्याने पालखी रस्ता अडवला. अरेरावी व शिवीगाळ केली. तसेच शुभेच्छा फलकही फाडले. तरीही धनगर समाजातील लोकांनी मंगळवार व बुधवार रोजी यात्रेचे दिवस असल्याने त्यास विरोध न करता वादविवाद नको म्हणून पालखी तेथे ठेवून रात्री २ वाजता शेकडो धनगर बांधवांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रासमोर ठिय्या ठोकला. त्यानंतर आज मंगळवारी सकाळी न्यायासाठी मसूर ग्रामपंचायतीसमोर धरणे धरले. (वार्ताहर)