शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

छोटे मासे गळाला; पण मोठ्यांचं काय ?

By admin | Updated: July 19, 2016 23:52 IST

पुरवठा शाखा लाच प्रकरण : शासकीय कार्यालय परिसरात ‘हप्तेगिरी’ची चर्चा; कारवाईच्या भीतीने अनेकांचा सावध पवित्रा

कऱ्हाड : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे दोन कर्मचारी नुकतेच लाचप्रकरणी ताब्यात घेण्यात आले. पण, त्यामुळे येथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आल्याने छोटे मासे गळाला तर लागलेच; पण मोठ्यांचं काय! अशी चर्चाही सुरू झाली आहे.तालुक्यातील महसूल विभाग या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतो. अलीकडील काही उदाहरणे पाहायचे म्हटले तर पोलिस पाटील भरती प्रक्रिया, अनधिकृत वाळूउपसा प्रकरण. एकदम ताजे उदाहरण म्हणजे तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षक भरत गुरव ऊर्फ पुजारी व विजय घोडके या दोघांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले; पण हे झाले एका पुरवठा विभागाचे. इतर विभागांमध्येही सारं काही आलबेल आहे, असं नाही.बेकायदेशीर वाळूउपसा तर इथल्या कर्मचाऱ्यांचे चांगले खुराकच म्हणून तर प्रत्येक ठेकेदार येथे जणू सिद्धी ‘विनायक’ लाच भेटायचा. सैदापूरचा जावई असणाऱ्या या व्यक्तीचा थाट लय मोठा. आता फारच चर्चा व्हायला लागल्यावर टेबल बदलण्याचं काम तहसीलदारांनी केलंय खर; पण हा श्री विनायक प्रसन्न झाल्याशिवाय अजूनही वाळूचा इकडचा कण जिकडं होत नाही, अशी चर्चा आहे.प्रत्येक विभागात टेबलावरून अन् टेबला खालून राजरोस व्यवहार ठरलेले आहे. हे सगळं धाडसाचं काम छोटे मासे करीत असले तरी त्यातील ठरलेली रक्कम मोठ्या माशांनाही पोहोच केली जात असल्याची चर्चा आहे. पण अडचणीत येतात ते छोटे मासेच.कऱ्हाड तालुका हा जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका ! त्यामुळे इथे महसूल विभागाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे येथे काम करण्याची संधी मिळावी म्हणून अधिकारीही फिल्डिंग लावून असतात. त्याचं कारण काय हे सांगण्याची गरज नाही.थोडक्यात येथील महसूल प्रशासन सध्या संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इथं सारं असंच चालत असं तालुक्यातील जनता बोलू लागली आहे; पण या साऱ्याचा परिणाम गेंड्याची कातडी पांघरलेल्यांवर होणार का ? महसूल विभागाचा कारभार भ्रष्टाचार मुक्त होणार का ? हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. (प्रतिनिधी)‘पुरवठा’ कडून अन्याय तर तहसीलदारांचे दुर्लक्षपुरवठा विभाग व रेशन धान्य दुकानदार यांच्याकडून धान्यपुरवठा बंद करण्यात आल्याने त्याबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तुळसण (ता. कऱ्हाड) येथील मारुती रामचंद्र वीर यांनी महिन्याभरापूर्वी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या अन्यायाबाबत पुरवठा विभागातील अधिकारी व धान्य दुकानदारावर दीड महिना उलटून गेला तरी अद्याप कारवाई झाली नसल्याची माहिती निवेदनाद्वारे मारुती वीर यांनी दिली आहे.महिनाभरातील चारजणांवर कारवाईलाच मागणीबाबत महिनाभरात दोन प्रकरणे कऱ्हाडला घडली आहेत. त्यामध्ये एक म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेचे वरिष्ठ लिपिक परशुराम डवरी व कनिष्ठ लिपिक अर्जुन लकेसर आणि कऱ्हाड येथील रेशनिंग धान्य पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक भरत गुरव ऊर्फ पुजारी व विजय घोडके अशा चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.