शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीची यादी सहा तारखेला जाहीर

By admin | Updated: February 4, 2017 00:08 IST

जिल्हा बँकेत खलबते : बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाचे सावध धोरण; बैठकीत विविध विषयांवर चर्चा

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे शुक्रवारी जिल्हा बँकेत दिवसभर खलबते झाले. बंडखोरीचे दुखणे वाढू नये, यासाठी राष्ट्रवादीने सावध पवित्रा घेत उमेदवारांची यादी सहा तारखेला अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. राष्ट्रवादीतर्फे ७८० इतक्या इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात चौरंगी काही ठिकाणी पंचरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. राष्ट्रवादीतील नाराज मंडळी भाजपच्या ताफ्यात सामील झाली आहेत. काही प्रमुख मंडळींनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला असल्याने पक्षाने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी जमले होते. सकाळपासूनच विविध तालुक्यांतील इच्छुक कार्यकर्ते पदाधिकारी बँकेत हजर होते. पाटण, खंडाळा, वाई, कऱ्हाड या तालुक्यांतील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बँकेचे संचालक माजी आमदार प्रभाकर घार्गे, नितीन पाटील, दादाराजे खर्डेकर, जितेंद्र पवार, संजय देसाई तसेच विविध तालुक्यांतील पदाधिकारी बँकेत हजर होते. सर्वजण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची वाट पाहत होते. पावणेचार वाजता रामराजे बँकेत दाखल झाले. त्याचवेळी ज्येष्ठ नेते माजी खासदार लक्ष्मणराव पाटील बँकेत दाखल झाले. रामराजे आल्यानंतर सर्वजण जिल्हा बँकेच्या मीटिंग हॉलच्या आत असणाऱ्या अँटिचेंबरमध्ये सर्वजण गेले. लक्ष्मणराव पाटील यांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती विषयी चर्चा केली. त्यानंतर ते दोघेही अँटिचेंबरमध्ये गेले. राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. संपूर्ण जिल्ह्यावर १९९९ पासून राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडून काढण्यासाठी विरोधकांचे डावपेच सुरू आहेत. अनेकांना पक्षप्रवेश देऊन त्यांच्या खेळ्या सुरू आहेत. त्यातच पक्षाशी प्रमाणिक राहणारे तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे उमेदवार निवडायचे आहेत, त्यामुळे अत्यंत सावधपणे उमेदवार निवडावे लागतील, असे मत अनेक नेत्यांनी या बैठकीत मांडले. विधान परिषदेला जो फटका बसला त्याची पुनरावृत्ती भविष्यात होऊ नये, याचा विचार करून उमेदवार निवडले जावेत, अशी इच्छा रामराजे व लक्ष्मणराव पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी यावेळी व्यक्त केल्याचे समजते. उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. (प्रतिनिधी)