शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

लिंबाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:06 IST

अंगापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान गावागावात सुरू आहे. ...

अंगापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान गावागावात सुरू आहे. मात्र, लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामदैवत कारजाई देवी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला.

या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या पाच असून, गावातील दोन गटामध्ये तीन - दोन असा सदस्य फाॅर्म्युला ठरला आहे. ग्रामपंचायत बिनविरोधसाठी निवडीमध्ये सदस्य म्हणून रामदास कणसे, मनीषा पिसाळ, संगीता कणसे, बाळकृष्ण कणसे, जयश्री गायकवाड यांची निवड करण्यात आली. पहिले सरपंचपद अडीच वर्षे घेणाऱ्या गटास २ जागा आणि त्यानंतर सरपंचपद घेणाऱ्या गटास तीन जागा असा ठराव कारजाई मंदिर येथे सर्वानुमते घेण्यात आला आहे. या ठरावामध्ये रामदास कणसे यांच्या गटास सरपंचपदाचा पहिला मान देण्याचे ठरले आहे, तर प्रशांत कणसे यांच्या गटास तीन जागा देऊन अडीच वर्षांनंतर सरपंचपदाचा मान मिळणार आहे. यापूर्वी या गावच्या झालेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. येथील दोन पारंपरिक पॅनेलमध्येच या निवडणुका होत होत्या. त्यामुळे या गावच्या निवडणुकीकडे या भागातील जनतेचे नेहमीच लक्ष वेधले जात होते. मात्र, यावेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्याबरोबरच निवडणुकीत होणारा भरमसाठ खर्च वाचला आहे व गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून बिनविरोधची संकल्पना राबविण्यात आली. यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह दोन्ही गटांचे प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ व तरुण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

फाोटो.. ०४अंगापूर

सातारा तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील बिनविरोध निवड झालेले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.