शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

लिंबाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 04:06 IST

अंगापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान गावागावात सुरू आहे. ...

अंगापूर : सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान गावागावात सुरू आहे. मात्र, लिंबाचीवाडी (ता. सातारा) येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा एकमुखी निर्णय ग्रामदैवत कारजाई देवी मंदिरात झालेल्या बैठकीत घेतला.

या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या पाच असून, गावातील दोन गटामध्ये तीन - दोन असा सदस्य फाॅर्म्युला ठरला आहे. ग्रामपंचायत बिनविरोधसाठी निवडीमध्ये सदस्य म्हणून रामदास कणसे, मनीषा पिसाळ, संगीता कणसे, बाळकृष्ण कणसे, जयश्री गायकवाड यांची निवड करण्यात आली. पहिले सरपंचपद अडीच वर्षे घेणाऱ्या गटास २ जागा आणि त्यानंतर सरपंचपद घेणाऱ्या गटास तीन जागा असा ठराव कारजाई मंदिर येथे सर्वानुमते घेण्यात आला आहे. या ठरावामध्ये रामदास कणसे यांच्या गटास सरपंचपदाचा पहिला मान देण्याचे ठरले आहे, तर प्रशांत कणसे यांच्या गटास तीन जागा देऊन अडीच वर्षांनंतर सरपंचपदाचा मान मिळणार आहे. यापूर्वी या गावच्या झालेल्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या झाल्या होत्या. येथील दोन पारंपरिक पॅनेलमध्येच या निवडणुका होत होत्या. त्यामुळे या गावच्या निवडणुकीकडे या भागातील जनतेचे नेहमीच लक्ष वेधले जात होते. मात्र, यावेळी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर धोका टाळण्याबरोबरच निवडणुकीत होणारा भरमसाठ खर्च वाचला आहे व गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून बिनविरोधची संकल्पना राबविण्यात आली. यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह दोन्ही गटांचे प्रमुख, ज्येष्ठ कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ व तरुण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गावाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

फाोटो.. ०४अंगापूर

सातारा तालुक्यातील लिंबाचीवाडी येथील बिनविरोध निवड झालेले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.